ताडी
ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहे.. ताडाच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर, त्यातुन निघणारा रस. हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात. हा रस प्रकृतीने थंड असतो. सूर्योदय झाल्यावर हा आंबतो. त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते.उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही. [ संदर्भ हवा ] महाराष्ट्र शासनाची या पेयास 'नीरा' म्हणून मान्यता आहे. शहरांमधून रस्त्यारस्त्यावर नीरा विकणारी अनेक केंद्रे असतात. नीरेमध्ये १२ टक्के साखर असते.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/28/%E0%B4%A8%E0%B5%8A%E0%B4%99%E0%B5%8D%E0%B4%99%E0%B5%8D_%E0%B4%B8%E0%B5%BC%E0%B4%AC%E0%B4%A4%E0%B5%8D%E0%B4%A4%E0%B5%8D%E0%B5%A8.jpg/250px-%E0%B4%A8%E0%B5%8A%E0%B4%99%E0%B5%8D%E0%B4%99%E0%B5%8D_%E0%B4%B8%E0%B5%BC%E0%B4%AC%E0%B4%A4%E0%B5%8D%E0%B4%A4%E0%B5%8D%E0%B5%A8.jpg)
ताडीपासून गूळ व साखरही बनते. ताडी आंबल्यावर पहिल्या ३ ते ८ तासात तिच्यात ३ टक्के एथिल अल्कोहोल बनते. ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल ५ टक्क्यापर्यंत वाढते. त्याहून अधिक झाल्यास ताडी माणसाने पिण्याच्या लायकीची रहात नाही.