जयंत बेंद्रे (२३ डिसेंबर, इ.स. १९५१ - २२ मार्च, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते.

बेंद्रे यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांनी एम.कॉम. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते मोहन जोशी यांच्यासह त्यांनी काही औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांनी मोरूची मावशीनाटकात काम केले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते. त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच मराठी चित्रपट आणि चित्रवाणी मालिकांतूनही भूमिका केल्या होत्या.

मोहन जोशी यांच्या नटखट नट-खट या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे.

सामाजिक कार्य संपादन

जयंत बेंद्रे हे अभिनेते मोहन जोशी यांचे खास मित्र होत. त्यांच्या आणि जयंत बेंद्रे, राजन मोहाडीकर, श्रीराम रानडे यांच्या मैत्रीला १९९८ साली २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून या चौघांनी 'मैत्री' या ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या संस्थेचे बोधवाक्य आहे … 'जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले’. या संस्थेद्वारे जयंद्र बेंद्रे हे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.

नाटके संपादन

  • आंधळी कोशिंबीर
  • नाथ हा माझा
  • मृगया
  • मोरूची मावशी

पुस्तके संपादन

  • नटखट नट-खट : मोहन जोशी यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचे शब्दांकन
  • माणसं आणि माणसं (कथासंग्रह)
  • शब्दांसंगे संवादू (कथासंग्रह)
  • समुद्र बिलोरी ऐना (कथासंग्रह - २०११)
  • सात एकांकिका
    • उद्या पुन्हा हाच खेळ
    • खेळ मांडियेला
    • निर्मितीकार
    • भुतासकी
    • मॅड मॅड मॅड फॉर ईच अदर
    • मुकी बिचारी कुणीही हाका
    • रुपयाभोवती दुनिया
  • Ye Kya Ho Raha Hai (इंग्रजी एकांकिका)

पुरस्कार संपादन

  • ’अभिनय सम्राट’ या लघुकथेस जी.ए. कुलकर्णी पुरस्कार
  • ’ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या लघुकथेला ’कथा दिल्ली’चा राष्ट्रीय पुरस्कार
  • ’माणसं आणि माणसं’ला मुंबईतील साहित्य दरवळ मंचतर्फे दिला गेलेला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.. (१२-७-२००९)
  • ’शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ’उत्कृष्ट कथा पुरस्कार’