जगदीश अवस्थी ( मार्च १३,इ.स. १९२३-इ.स. २००८) हे भारतीय राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बिल्हौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.पुढे ते इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.