चर्चा:तिरुवनंतपुरम जिल्हा

मराठी शुद्धलेखन नियम क्रमांक १४ अन्वये अन्‌ हा एकुलता एक शब्द सोडला तर मराठीतला किंवा इतर कोणत्याही भाषेतला कोणताही शब्द मराठीत लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये. उदाहरणार्थ:वन्दे मातरम, कुर्यात सदा मंगलम वगैरे वगैरे लिहिणे उचित. मास्टर ऑफ़ आर्ट्‌स साठी एम.ए.(एम्‌.ए. नाही!) पण बॅचलर ऑफ़ लॉज साठी एल्‌एल.बी. पहिल्या ल चा पाय मोडला कारण तो शब्दाच्या शेवटी नाही. तसेच एम.एस्‌सी. त्यामुळे तिरुअनंतपुरम्‌ चालणार नाही. तिरुअनंतपुरम लिहायला पाहिजे. पाय न मोडता देखील मराठी उच्चारपद्धतीनुसार शेवटचे अक्षर हलन्त उच्चारले जाते. हा नियम जर नसता तर प्रत्येक अकारान्त इंग्रजी श्ब्द मराठीत शेवटच्या अक्षराचा पाय मोडून लिहावा लागला असता. जसे: जॉर्ज्‌, प्रोग्रॅम्‌, व्हाइट्‌ हाउस्‌ इत्यादी. --J १५:३७, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

Copied this to विकिपीडिआ:चावडी
MarathiBot १५:५०, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)
"तिरुवनंतपुरम जिल्हा" पानाकडे परत चला.