कापूरहोळ - हरिचंन्द्रि गावाची वीर धाराऊ

जेव्हा शिवाजी महाराज व बाल संभाजी राजांची आग्राहुन सुटका झाली, पल्ला लांबचा होता, वाट खडतर होती. मोजके मावळे बरोबर घेउन महाराजानीं मायभुमीकडे कुच केली. असंख्य मुगल शत्रु मागावर होते, अनेक दिवसांचा प्रवासा नंतर महाराज शंभू राजांना घेउन महाराष्ट्रात दाखल झाले. शत्रु मागावर होतेच म्हणुन महाराज सहयाद्रिच्या रांगा पार केल्यावर भोर प्रांन्तात प्रवेश केल्यावर स्वराज्यापर्यंतची दगदग संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. बाळ शंभू राजांना पुण्याजवळील कापूरहोळ - हरिचंन्द्रि गावात वीर धाराऊ याच्या घरी ठेवले, या वीर धाराऊ मातेने या बाळ शंभू राजांना आपले दुध पाजले, ही माता जन्माची नाही पण दुधाची आई झाली. मुगल शत्रुची तमा न बाळगता कापुरहोळ - हरिचंन्द्रि या गावचे गाडे, पाचकाळे, खुटवड या घरान्यानी बाळ राजांचा सभांळ व शत्रु पासुन लपवुन ठेवलेआणी आपल्या धन्याच्या (शिवाजी महाराजाच्या)मीठाची लाज राखली. महाराज स्वराज्यात सुखरुप पोहोचल्या नंतर काही काळाने संभाजी बाळ सुखरूपपणे स्वराज्यात दाखल झाले.

देश धमॅ पर जान देनेवाला हमारा शंभू राजा था । देश धमॅ पर जान देनेवाले संभाजी राजा को दुध पीलानेवाली हमारी वीर धाराऊ माता थी । ।

"कापूरहोळ" पानाकडे परत चला.