चक्रधरस्वामी साहित्य संमेलन

(चक्रधरस्वामी साहित्यसंमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंगोली जिल्ह्यातल्या शेवाळा गावातील (तालुका कळमनुरी) महदंबा साहित्य संघ, ही संस्था दरवर्षी चक्रधरस्वामी साहित्य संमेलन भरवते. या संस्थेने भरविलेली काही संमेलने : -

  • १ले ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते.
  • २री, ३री आणि ४थी ग्रामीण चक्रधरस्वामी साहित्य संमेलने, शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.
  • ५वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
  • ६वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.
  • ७वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. आ.ह. साळुंखे अध्यक्ष होते.
  • ८वे राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्य संमेलन, इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला झाले. अध्यक्षस्थानी उत्तम कांबळे होते..


पहा : साहित्य संमेलने