चंदगड

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक गाव

चंदगड हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे. चंदगड महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ वसले असून ते बेळगावपासून ४० किमी तर कोल्हापूरपासून ११४ किमी अंतरावर आहे. चंदगडची लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे. कोल्हापुरातील सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडतो.चंदगड तालुक्यात तिलारीनगरला मोठा विद्युत प्रकल्प आहे.कि जो संपूर्ण जमिनिखाली आहे.

चंदगड is located in महाराष्ट्र
चंदगड
चंदगड
चंदगडचे महाराष्ट्रमधील स्थान

तिलारीनगर

       गर्द हिरवाई, शीळ घालणारा वारा, पक्ष्यांबरोबर रंगणारा साद-प्रतिसादाचा खेळ, झाडांना आलेल्या मोहराचा ओलसर सुगंध आणि हिरवाईत लपेटलेल्या भव्य पाषाणात कोरलेल्या प्राचीन गुंफा, तेथील अवशेष, करवंदं हातानं ओरबडून खाण्यातला आनंद काही वेगळाच. तिलारीतली गर्द वनराई असो कि आंबा-शाहूवाडी किंवा गगनबावड्यातील वनराईंनी नटलेली गावे असोत. येथील एका दिवसाच्या ट्रीपमुळे आठवड्याचा शीण निघून जातो. 
      निसर्गसंपन्नतेने नटलेल्या चंदगड तालुक्यात प्रतिमहाबळेश्वरसारखे विकसित होणारे अनेक पॉईंट आहेत. मात्र सरकारच्या उदासिनतेमुळे तालुक्याच्या पर्यटन विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. परंतु राज्याचा वन विभाग व कोदाळी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नातून तिलारीनगर (ता. चंदगड) येथील परिसरात पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय असे ‘ग्रीन व्हॅली पर्यटन केंद्र’ तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

तालुक्याच्या पूर्वेकडे आणि गोवा सीमेजवळ असलेल्या तिलारीनगर परिसरात अतिशय रमणीय वातावरणात दऱ्याखोऱ्यांमध्ये व्यवस्थित रचना करून साक्षात महाबळेश्वरमधील विविध वैशिष्ट्यांची आठवण या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांना होते. हा परिसर ऐतिहासिक किल्ले पारगडच्या जवळच असल्याने या भागाला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी राहण्याजेवण्याचीही सोय असून पर्यटकांना जिप्सीतून या परिसरात फेरफटका मारताना वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन घेता येते. याशिवाय रात्रीचा निसर्ग, फेसाळणारे पाणी, हिरव्यागार दऱ्यांचे मनमोहक दर्शन घेतल्यानंतर आपण महाबळेश्वरातच असल्याचा भास पर्यटकांना होतो. या ठिकाणी पोहण्याची सोय, पर्यटकांना राहण्याची सोय, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, जेवणासाठी ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, मध्यभागी पाण्याचे टँक, सभोवती पेव्हिंग ब्लॉक बसवून तयार केलेले फूटपाथ आणि परिसरातील झाडांना जागोजागी कट्टे बांधल्यामुळे एखाद्या वनगावात असल्याची अनुभूती मिळते. याशिवाय येथे निसर्गाच्या सानिध्यात साकारलेले हे केंद्र पर्यटकांच्या मनाला रोजचे धकाधकीचे जीवन काही काळ विसरायला लावणारा हा परिसर आहे. कॅनॉलमधून फेसाळणारे पाणी यामुळे येथे आल्यानंतर मनाला जाणवणारा थकवा काही क्षणातच नाहीसा होवून वेगळ्या विश्वात आल्याचा आनंद मिळतो. हे पर्यटन केंद्र येत असल्याने तसेच गोव्याला जाताना चंदगड तिलारीनगर दोडामार्ग या मार्गावर असल्यामुळे अनेक पर्यटक गोव्याला जाताना आवर्जून येथे भेट देत असतात. या ठिकाणी वाढदिवस व खासगी पार्टीच्या आर्डरही स्विकारल्या जात असल्याने येथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.

स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे प्रति महाबळेश्वर महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुक्यातील तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजेच गरिबांचे प्रती महाबळेश्वरच आहे. कोल्हापूरहून जाण्यासाठी १४0 किलोमीटर अंतर आहे. तीन तास वेळ जातो. परिसरात राहण्याची सोय आहे. येथे स्वप्नवेल पॉर्इंटसह पारगड, रातोबा पॉर्इंट, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च पॉर्इंट, मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे मोर, वानरं, ससे, हत्ती, रानडुकरे, सांबर, गवे व निरनिराळे पक्षी व प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर व विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. पारगडबरोबरच तालुक्यातील कलानंदीगड, गंधर्वगड, महिपाळगड, आदी गड पाहिल्यानंतर शिवकालीन इतिहासाची आठवण होते. स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे तर महाबळेश्वर आणि आंबोलीतही सृष्टी सौंंदर्य नाही असा निसर्गाचा अद्वितीय खजिना येथे पाहावयास मिळतो. धुक्यांचे पांघरूण व धो-धो कोसळणारा पाऊस आणि रोरावणारा वारा, तिलारी प्रकल्पाच्या कॅनॉलच्या पुलाखालील प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा, भन्नाट वारा, आठवडा-आठवडा जमिनीवर राहणारं धुकं आणि फेसाळणारे शुभ्र धबधबे येथील निसर्गाचे सोबती आहेत. रस्ते आणि पर्यटनाचा विकास झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. तिलारीनगर आणि बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील हॉटेलमध्ये सहकुटुंब गावरान जेवणाचा आस्वाद पर्यटकांना मिळत आहे.

पाहता येईल असे रातोबा, पॉप्युलर धबधबा, सर्च पॉईंट , तिलारी धरण महत्त्वाच्या शहरापासूनचे अंतर कोल्हापूर : १५५ कि.मी., गडहिंग्लज : ७२ कि.मी. , चंदगड : २२ कि.मी. , बेळगाव : ५० कि.मी. कसे जाल? कोल्हापूरपासून बेळगाव, पाटणे फाटा, मोटणवाडी, तिलारी

       किंवा 

कोल्हापूर, कागल, निपाणी, तवंदी फाटा, काळभैरी, गडहिंग्लज, चंदगड, तिलारी

चंदगड हा तसा कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमारेषेवर असणारा कोल्हापूर मधील शेवटचा तालुका आहे. महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो. चंदगड तालुक्याला जवळपास शहान्न व लाख हेक्टर्स येवढे विस्तृत क्षेत्रफळ लाभले आहे. या विस्तृत क्षेत्रफळावर सर्वत्र एकसारखी भौगोलिक परिस्थिती आढळत नाही. साधारणपणे तालुक्याची पश्चि म आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये सरळ-सरळ विभागणी करता येते. यापैकी पश्चिचम भाग अतिपावसाळी, डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेला आहे. तर पूर्वेला तुलनेत कमी पाऊस आणि सुपीक जमीन लाभली आहे. त्यामुळे दोन्ही विभागात शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आणि घेतल्या जाणाऱ्याि पिकांमध्येही थोडाफार फरक दिसून येतो. पूर्वेला भातपेरणी (धुळवाफ) केली जाते. म्हणजे भात मातीत कुरीने पेरले जाते तर पश्चिमेला चिखल करून रोप लागण केली जाते. पश्चिजमभाग कोकणी भाषिक प्रदेशाशी सलग्नक आहे तर पूर्व भाग कानडी भाषिक प्रदेशाशी सलग्नज आहे. त्यामुळे दोन्ही विभागात सांस्कृतिक भिन्नात्व दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटकी बेंदूर आणि पश्चिहमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. त्यामुळे तालुक्यात चंडगडी बोलीची वेगवेगळी रुपे प्रत्ययास येतात, पुर्व चंदगडी आणि पश्चिम चंदगडी असे उपवर्गीकरणही तेथील बोली भाषेचे करता येते.हा निसर्ग संपन्न असा तालुका आहे.


चंदगड परिसरात बोलली जाणारी बोली. या बोलीची या परिसरात दोन रूपे. एक कन्नड भाषेच्या प्रभावातील तर एक कोकणी भाषेच्या प्रभावातील


तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी वतन दिलेला पारगड किल्ला -

किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांतसुंदर किल्ला.किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांतसुंदर किल्ला. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. या हिरव्यागार वनश्रीनेच त्याच्याकडे खेचायला होते. यातच पाऊस कोसळू लागला, की पारगडाकडे वाट वाकडी करावीशीच वाटते.
       समुद्रसपाटीपासून ७३८ मीटर उंचीवर वसलेल्या पारगडास भेट देण्यासाठी कोल्हापूरहून चंदगड गाठावे लागते. चंदगड ते पारगड हे अंतर ३० किलोमीटर. चंदगडहून पारगडजवळच्या इसापूर गावासाठी दुपारी १२ वाजता बस सुटते. ही चुकल्यास मात्र संध्याकाळपर्यंत बस नाही. इसापूर गावातून पारगड साधारण पाऊण तासाच्या चालीवर. पण आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणामुळे मन प्रसन्न होत असते. जवळ येताच हिरव्यागार दरीतून उठावलेला पारगडाचा डोंगर दिसू लागतो आणि आपल्या पावलांस आपोआपच गती येते.
        गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केला आहे. या वाटेवरच जुन्या दरवाजांचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालीन जांभ्या दगडात बांधलेल्या २०० पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गडावर प्रवेश करताच समोर त्या तोफा आणि डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.तब्बल ४८ एकर क्षेत्रफळाच्या दक्षिणेवर पसरलेलय़ा पारगडाच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कडय़ाची तटबंदी असून, दक्षिणेला थोडय़ा उतारानंतर पुढे प्रचंड खोल दरी आहे. या भक्कम नैसर्गिक संरक्षण रचनेमुळे व गडावरील इमानी मावळय़ांमुळे याच्या निर्मितीपासून पुढे तब्बल १८१ वर्षे पारगड अजिंक्य राहिला. शिवरायांनी हा किल्ला बांधून याची वास्तुशांती केली व गृहप्रवेश केला आणि इथल्या मावळय़ांना राजांनी आज्ञा दिली. ‘चंद्र, सूर्य गगनी तळपताहेत तोवर गड जागता ठेवा!’ आणि शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे ३४० वर्षे हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आजही जागता ठेवलाय.असा हा गड पाहण्यास सुरुवात करू. डाव्या हातासच मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच एक समाधी आहे. ही कुणाची याची मात्र इतिहासात नोंद नाही. येथून थोडय़ा अंतरावरच पारगडावरील लोकवस्ती सुरू होते. मळलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर आपण पारगडाच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळेसमोर येऊन पोहोचतो. शिवछत्रपतींचा पुतळा इथे आपले स्वागत करतो. थोडय़ा अंतरावरच भवानी मातेचे जीर्णोद्धारित मंदिर आहे. भवानी मातेची काळय़ा पाषाणातील मूर्ती देखणी, शस्त्रसज्ज, तेजःपुंज अशी आहे. तिला पाहताच प्रतापगडावरील भवानीदेवीची आठवण होते. या मंदिराच्या मंडपात शिवकालातील प्रसंग दाखविणारी चित्रे, तसेच मावळ्यांचे, संतांचे पुतळे आहेत. या सर्वामुळे या मंदिरास एका छोटय़ा संग्रहालयाचे स्वरूप आले आहे.
      पारगडास फेरफटका मारू लागलो, की गुणजल, महादेव, फाटक, गणेश असे चार तलाव दिसतात. या बरोबरच गडावर शिवकालीन अशा १८ विहिरीही आहेत. पण त्यापैकी बऱ्याच बुजलेल्या आहेत. मालेकर, फडणीस, महादेव, माळवे, भांडे, झेंडे नावाचे बुरुज भेटू लागतात. गडाच्या उत्तरेकडील बाजूस महादेव मंदिर आहे. या मंदिराजवळून खालच्या दरीतले घनदाट जंगल पाहणाऱ्या खिळवून ठेवते.गड फिरण्यास दोन-एक तास पुरेसे होतात. गडावर मुक्कामासाठी शाळा किंवा भवानी मंदिराशेजारील खोली उपयोगाची आहे. आगाऊ कल्पना दिल्यास गावातील दुकानात चहा- फराळाची सोय होऊ शकते. पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावर झेंडा लावण्याचे काम असणारे बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, शिवकालातले तोफखान्याचे प्रमुख विठोजी मावळय़ांचे वंशज कान्होबा माळवे, घोडदळाच्या पथक प्रमुखाचे वंशज विनायक नांगरे व गडक ऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे अजूनही राहतात. पण गडावर उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्यामुळे गडावरील बरेच लोक सैन्यभरती, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगावी गेलेले आहेत. दरवर्षी माघ महिन्यात देवीचा उत्सव असतो. तेव्हा ७ दिवस गडावर नाटक, गोंधळ असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्या वेळी मात्र वर उल्लेख केलेल्या सर्व घराण्यातील लोक आपणास गडावर भेटतात. सध्या तानाजीचे वंशज बाळकृष्ण मालुसरे बेळगावला राहतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार, सिंहगडावर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यावर शिवरायांनी आपल्या गळ्यातील समुद्र कवडय़ाची माळ, तानाजींच्या देहावर ठेवली होती ती कवडय़ाची माळ व मालुसरे घराण्याचा मूळ पुरुष रायबाजी बिन तानाजी मालुसरे यांची अस्सल वंशावळ अशा इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या वस्तू त्यांनी आपल्या प्राणापलीकडे जपून ठेवल्या आहेत. पारगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवीसन १६७६ साली या गडाची निर्मिती केली असे आढळते. पारगडचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायाजी मालुसरे यांची शिवरायांनी नेमणूक केली. काही दिवस स्वतः महाराज या गडावर मुक्कामास होते, असे गडकरी अभिमानाने सांगतात. पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर छुपे हल्ले करून त्यांना पुरते हैराण केले. शेवटी खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताना कुमक घेऊन येण्यास सांगितले. पण गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. अखेर कंटाळून खवासखान रामघाट मार्गे कोकणात उतरला आणि मोघलांनी पारगडासमोर सपशेल हार पत्करली. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर मराठा राज्य संपून इंग्रज अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे.
       असा हा इतिहाससंपन्न किल्ले पारगड जुन्या अवशेषांनी व अजूनही नांदत्या गडक ऱ्यांच्या घरांनी जागता असून, निसर्गानेही संपन्न आहे. पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी बहरलेले असून, आजही त्यात जंगली जनावरे आहेत. या हिरवाईमुळे आपण कोणत्याही ऋतूत गडास भेट देऊ शकतो. पावसाळय़ात हे सौंदर्य अजून वाढते. इतिहास आणि निसर्गाच्या या प्रेमातून पारगडाची वाट अनेक जण चढत असतात.