वर्णन संपादन

वर-वधू यांच्या जन्म पत्रिकेवरून गुणमेलन म्हणजे त्यांची जन्मनक्षत्रे,राशी व जन्मकुंडल्या यावरून तपास करून त्यांचे स्वभाव, गुणधर्म इत्यादी जाणुन घेण्याचे साधन आहे.

नाडीगुणाकरिता ८ गुण,राशींकरिता ७ गुण,गण ६ गुण,ग्रहमैत्री ५ गुण,इत्यादी प्रकारे गुण काढून मग गुणमेलन करतात.असे एकूण गुण ३६ होतात.सर्वसाधारणतः,पंचागात याची कोष्टके दिलेली असतात व एक तक्ता दिलेला असतो.त्यावरून गुण व दोष सहजपणे काढता येतात.

सर्वसाधारण समज असा आहे कि,१८ पेक्षा कमी गुण असल्यास विवाह जुळवु नये.पंचांगात याबद्दल विविध नियम दिलेले असतात.