एस.एस. रामदास

(एस.एस रामदास या पानावरून पुनर्निर्देशित)

एस.एस. रामदास हे एक भारतीय प्रवासी जहाज होते. पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून फेऱ्या करणारे ४०६ टनाचे हे जहाज १९३६मध्ये बांधले गेले.

दुर्घटना संपादन

हे जहाज १७ जुलै, १९४७ला (गटारी अमावास्या) मुंबई ते रेवस फेरीसाठी निघालेले असताना कुलाबा पोइंटपासून ८ किमी अंतरावर काश्याच्या खडकाजवळ अंदाजे सकाळी ८:०५ वाजता वादळात सापडून बुडले. यावरील ७००+ प्रवाशांपैकी ६९० व्यक्ती बुडाल्या.