आगरी साहित्य विकास महामंडळ दर वर्षी आगरी साहित्य संमेलन आयोजित करते.

  • १३ वे आगरी साहित्य राज्यस्तरीय संमेलन नवीन पनवेल वसाहतीमध्ये १० व ११ जानेवारी २०१५ या कालावधीत होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष कादंबरीकार चंद्रकांत मढवी हे आहेत.
  • १२ वे आगरी साहित्य संमेलन अलीबागजवळील चेंढरे या गावी २ व ३ मार्च २०१४ या कालावधीत झाले. अध्यक्षस्थानी कैलास पिंगळे होते.
  • ११ वे राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन भांडुप (मुंबई) येथे झाले होते.
  • राज्यस्तरीय दहावे आगरी साहित्य संमेलन १७ आणि १८ डिसेंबर २०११ या कालावधीत पनवेलच्या उलवा नोडमधील वहाळ या गावात झाले.
  • ९ वे येथील दिवंगत कवी परेन शिवराम जांभळे साहित्यनगरीत आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने ११ व १२ डिसेंबर २०१० या कालावधीत वाशीगाव येथे झाले. संमेलनाध्यपदी साहित्यिक अविनाश पाटील होते.
  • भिवंडीत फेब्रुवारी २००५ मध्ये ४ थे अखिल महाराष्ट्र आगरी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.


पहा :- साहित्य संमेलने