शके 1571 मध्ये पंढरपूर हून परत जाताना श्री समर्थांचा मुक्काम मेथवडे येथे माण नदीमध्ये असलेल्या मांडवखडक या खडकावर होता. भिक्षा मागून परतणाऱ्या शिष्यासोबत श्री अनंत बुवा कुलकर्णी मेथवडेकर श्री समर्थ दर्शनासाठी गेले. तेथे त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. श्री समर्थांना त्याच नदीत विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्ती मिळाल्या. मेथवडे मठ स्थापना करून त्या मूर्तींची स्थापना समर्थांच्या हस्ते झाली. समर्थ व वारकरी संप्रदाय समन्वयाची मुहूर्तमेढ समर्थांच्या हस्ते झाली. परंपरेने समर्थांचे प्रतिनिधी म्हणून मेथवडे मठातून आषाढी वारी पंढरपूर साठी सुरू झाली. पुढे श्री गोजीवनदास चौंडे महाराज व त्यांचे पुत्र श्री नानामहाराज चौंडे यांनी या वारीला दिंडीचे स्वरूप दिले. पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा ट्रस्ट कासारघाटावर स्थापन करून समर्थांनी दिलेल्या पादुका तेथे स्थापन झाल्या.

मेथवडे मठातील श्री राम मूर्ती
श्री अनंतबुवा मेथवडेकर,समर्थ रामदास स्वामी आणि श्री कल्याण स्वामी

अनंतबुवा मेथवडेकर यांची समाधी सांगोला तालुक्यातील मेथवडेया गावी आहे मेथवडे हे ठिकाण सांगोले तालुक्यात असून पंढरपूर पासून मिरज मार्गावर 22 किमी. अंतरावर आहे. .श्री अनंत बुवा मेथवडेकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य ५ असते.या पादुकांना प.पू.श्री. श्रीधरस्वामी यांनी चांदीचा पत्रा लावून मढवून दिल्या. पंढरपूर च्या या मठातील श्री राम मूर्ती फार सुंदर आहेत. मेथवडे मठाच्या अधिपत्याखाली मंगळवेढा, आटपाडी व तिकोटा येथील मठ स्थापन झाले. दरवर्षी मेथवडे सज्जनगड अशी वारी नेतात.

==काव्य==   

सुलोचना गहिवर, सुलोचना आख्यान, रामदास स्तुती. ,अभंग , पदे. , आरती असे लिखाण श्री अनंत बुवा मेथवडेकर रामदासी यांनी केले आहे.