सुधी रंजन दास

भारताचे पाचवे सरन्यायाधीश

सुधी रंजन दास (१ ऑक्टोबर, इ.स. १८९४:टेलीरबाघ, बांगलादेश - १८ सप्टेंबर, इ.स. १९७७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १ फेब्रुवारी, इ.स. १९५६ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९५९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता आणि पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

देशबंधु चित्त रंजन दास हे त्यांचे चुलतभाऊ होत.