शिवाजी विद्यापीठ

महाराष्ट्रातील एक विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना १९६२ साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

शिवाजी विद्यापीठ
ब्रीदवाक्य ज्ञानसेवामृतम्'
Campus शहरी, ८४९ एकर



याला शिवाजी विद्यापीठ असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्‍नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्‍नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीटापैकी एक आहे.

हे सुद्धा पहा संपादन