"उद्धव स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Uddhav swami.jpg|thumb|समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य उद्धव याच्यासाठी बनविलेली गोमय मारुतीची मूर्ती]]
'''आख्यायिका :''' नाशिक जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती (समर्थ रामदास)नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकून समर्थांनी त्यांना 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. परंतु मृत्यू पावलेला पती व स्वतःही सती जाऊन मृत्यूला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या त्या स्त्रीने विचारले की हा आशीर्वाद कधी पूर्ण होईल? तेव्हा समर्थांनी हा आशीर्वाद रामाचा आहे असे सांगितले व मंत्र सामर्थ्याने त्या प्रेतास जिवंत केले. या दाम्पत्याला पुढे आठ मुले झाली.त्यातील पहिले म्हणजे उद्धव होते. उद्धव स्वामींच्या आई वडिलांनी त्यांना समर्थ चरणी अर्पण केले.
 
'''अन्य इतिहास :''' नाशिकजवळच्या दशपंचक गावचे सदाशिव दशपुत्रे कुलकर्णी आणि त्यांची पत्‍नी उमाबाई यांच्या पोटी झालेला उद्धव नावाचा पुत्र आईवडिलांनी रामदास स्वामींच्या स्वाधीन केला. रामदासांनी त्याला आपला शिष्य करून घेतले. हा रामदास स्वामींचा पहिला शिष्य. गोदावरीच्या पूर्वेला टाकळी रामदासांचा आद्य मठ होता. समर्थ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर त्या मठाचे अधिपत्य स्वामींनी उद्धवकडे सोपवले, आणि उद्धव हे उद्धवस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे इंदुरबोधन(मनमाड-हैदराबाद रस्त्यावरील हल्लीचे निजामाबाद) या गावी दुसरा मठ स्थापन केल्यावर, रामदास स्वामींनी तोही उद्धवस्वामींना चालवायला दिला. या दोन्ही मठांत उद्धवस्वामींच्या परंपरा सापडतात.
उद्धव स्वामी मूळचे नाशिकचे. त्यांचे टाकळी व इंदूर बोधन येथे २ मठ आहेत. टाकळी येथे समर्थांनी त्यांना गोमयाची मारुतीची मूर्ती दिली. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतःच्या हातांनी ही गोमयी मिश्रणाच्या मूर्तीची स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. पुढे रामदास स्वामींनी आणखी दहा मारुती स्वहस्ते स्थापन केले.
 
उद्धव स्वामी मूळचे नाशिकचे. त्यांचे टाकळी व इंदूर बोधन येथे २ मठ आहेत. टाकळी येथे समर्थांनी त्यांना गोमयाची मारुतीची मूर्ती दिली. १६३३ च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतःच्या हातांनी ही गोमयी मिश्रणाच्या मूर्तीची स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. पुढे रामदास स्वामींनी आणखी दहा मारुती स्वहस्ते स्थापन केले.
 
उद्धवस्वामींचे देहावसन शके १६३२ मध्ये (इ.स.१७१०)फाल्गुन पक्षातल्या शुद्ध प्रतिपदेला बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाले, असे इंदुरबोधन मठातील एका बाडात लिहिलेले आहे. उद्धवस्वामींची मुख्य समाधी टाकळीला आहे, आणि पूजेसाठी दुसरी समाधी इंदुरबोधन मठात बांधलेली आहे.
 
'''उद्धवस्वामींची काव्यरचना ''' श्लोक, पदे, प्रकरणे या स्वरूपाची आहे. त्यांतील वर्णनावरून उद्धवस्वामींची रामदासांवर अतिशय निष्ठा असल्याचे कळून येते. त्यांनी शिवराम या नावानेही काही रचना केल्या आहेत. '''आम्हीहि पाषाण श्रीनें कमावीलों । शिवराम जालों पावन चि॥''' असे त्यांनी लिहून ठेवले आहे. उद्धवस्वामींनी रामदास स्वामींचे गद्य चरित्र लिहिले आहे असे म्हणतात, पण अजूनपर्यंत ते सापडलेले नाही.
 
शं.श्री.देव यांनी ’श्रीसमर्थशिष्य़ उद्धवस्वामीं’ असे नाव असलेले उद्धवस्वामींचे चरित्र लिहिले आहे.