"मुस्लिम मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
==मराठी साहित्यातील एकात्मता==
"इ.स. १९९० हे वर्ष ज्ञानेश्वरी-सप्तशताब्दी वर्ष हो्ते व त्याच वर्षी संत वाङ्‌मयाचे अभ्यासक प्रा. यू.म.पठाण हे पुण्याला होणाऱ्या ६३ व्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी प्रा. फ.म. शहाजिंदे हा एकच मुस्लिम मतदार होता. अशा परिस्थितीत यू.म.पठाण भरघोस मतांनी निवडून आले. याचा अर्थच हा, की साहित्यप्रेमी जातीयवादी वा धर्मवादी विचार करीत नाहीत. साहित्य सेवेचीही योग्य ती बूज राखतात. एकात्मता ही सर्व मराठी माणसांच्या रक्तातच आहे.
 
==उदयोन्मुख मुस्लिम मराठी साहित्यिक==
नावारूपाला आलेल्या बरेच मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत. पण, महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत असे कितीतरी उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, की त्यामुळे मराठी समाजातल्या एका महत्त्वाच्या घटकाचे अत्यंत खडतर जीवन व त्या संदर्भातील साहित्याचे दालन दुर्लक्षित व उपेक्षित न राहावे, हा अखिल भारतीय मुस्लिम मराठी संमेलनाचे आयोजन करण्यामागील एक महत्त्वाचा हेतू आहे.
 
==संमेलनांचे अध्यक्षस्थान==