"मनमोहन नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू हे ११-११-१९११ सालीरोजी जन्मलेले मराठी भाषेचे एक लोककवी. आयुष्यभर केवळ लेखनावर जगलेल्या या माणसाने चरितार्थासाठी सर्व काही केले, प्रचंड हाल काढले आणि अवहेलना सहन केली. त्या काळात प्रसंगी मंगलाष्टके लिहून दिली, आणि ती संख्यासुद्धा पाच हजारांच्यावर असावी. पोटासाठी त्यांनी भविष्यही लिहिले. त्यांच्या कादंबर्‍या आणि लघुकथाही गाजल्या होत्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी एक पुस्तक लिहिले होते, त्याची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशन लवकरच काढणार आहे.(२७-६-२०११ ची बातमी). त्यांच्या आठवणी सांगणारे "आठवणीतील मनमोहन" हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित होतझाले. या पुस्तकात भा.द.खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना.नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. अतिशय मनस्वी आयुष्य जगलेल्या या अतर्क्य व अनाकलनीय स्वभावाच्या लोकविलक्षण कवीचे वर्णन मराठी साहित्यिक [[जयवंत दळवी]] यांनी "चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस"असे केले आहे.
 
==त्यांच्या गाजलेल्या कविता==
 
* आमुचे नाव आसू गं
* आरसा फोडलात तुम्ही, आतांआता वेणी घाला माझी
* कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा
* जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
* ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
* मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला
* राधे तूझा सैल अंबाडा
* विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
* शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
* हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल