"रुक्मिणीस्वयंवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
हा [[एकनाथ|एकनाथांचा]] पहिला आख्यानपर ग्रंथ होय. त्यांच्या भागवतावरील टीकेला काशीच्या पंडितांनी मराठीत अशी रचना करणे आक्षेपार्ह ठरविल्यामुळे एकनाथांनी काशीला जाऊन हा ग्रंथ लिहिला. त्यात एकूण १८ अध्यायात १७१२ ओव्यांची रचना केली आहे. एकनाथांनी या ग्रंथाद्वारे भागवतातील मूळ
▲ओव्यांची रचना केली आहे.भागवतातील मूळ कथानकाचे आध्यात्मिक रुपक बनवीले आहे.नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत निर्माण झाली.लोकमानसातही स्थान मिळाले.आजही विवाहेच्छुक तरुणी याचे पारायण करतात.या मागील एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.यात ग्रुहप्रवेशाचा विधी आहे व त्यावेळी वधूवराला भाणवसासी बसविले जाते.हा विधी म्हणजे वधूला केलेला उपदेश आहे.यात रेवती म्हणजे बलरामाची पत्नी-रुक्मिणीची जाऊ,भानवसा -संसारात भान राखण्याचा वसा देते."तिला आपली कर्तव्य कोणती,रीतीभाती कोणत्या ते सांगते.आपण प्रसन्नचित्त राहिले पाहीजे,घरातील जळमटे-खरकटे बाहेर टाकले पाहीजे,कामक्रोध रुपी उंदीर घर पोखरतात त्यांच्या येण्याच्या वाटा लिंपल्या पाहिजेत, कस्पटे{मनातील पूर्वग्रह्)चाळून पाखडून टाकावीत्-म्हणजे पोळ्याकशा चोखट होतात ते समजाऊन सांगीतले आहे.रेवती , संसारात् कसे वागावे -भान राखावे याचा उपदेश करते.हे सर्व वर्णन वाचले की उपवर कन्येने हे वाचण्याचा जो संकेत होता त्यामागे संस्कार होता.
नरेंद्र कवीने रुक्मिणीस्वयंवर याच नावाचा एक अपुरा राहिलेला काव्यग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ अर्थात एकनाथांच्या ग्रंथाहून वेगळा आहे.
|