"माधव गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्री. माधव गोडबोले (जन्म १५ ऑगस्ट १९३६) यांनी अमेरिकेतील विल्यम्स ...
(काही फरक नाही)

२०:३२, ४ जुलै २०११ ची आवृत्ती

श्री. माधव गोडबोले (जन्म १५ ऑगस्ट १९३६) यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून ‘विकासाचे अर्थशास्त्र ’ या विषयात एम.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती. या अगोदर, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. श्री. माधव गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्षही होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बॅंकेत पाच वर्षे काम केले.

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही(यादी अपूर्ण) सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.

आतापर्यंत त्यांनी ९ इंग्रजी आणि ६ मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance(2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India's Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले.

‘अपुरा डाव’ हा त्यांच्या आत्मचरित्रात्मक An unfinished innings या पुस्तकाचा मराठी अनुवाद. तर हिंदुस्थानच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition - An Inquest.चा ‘फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा ’ हा. हे दोन्ही मराठी अनुवाद अनुक्रमे १९९८ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाले.

त्यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत. अनेक वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत ते लेखन करतात.

ग्रंथसंपदा

श्री. माधव गोडबोले यांनी लिहिलेली काही पुस्तके:

  • An unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant
  • A Quest for Good Governance(2004)
  • India's Parliamentary Democracy on Trial(2011)
  • Public Accountability and Transaparency : Imperatives of Good Governance(2003)
  • The Changing Times : A Commentary on Current Affairs
  • The Holocaust of Indian Partition - An Inquest(?)
  • The Judiciary and Governance in India(2009)
  • अपुरा डाव(१९९८)
  • नवी आव्हाने, कालबाह्य मानसिकता(२००३)
  • नव्या दिशा बदलते संदर्भ(१९९८)
  • प्रशासनाचे पैलू, खंड १ (१९९९)
  • प्रशासनाचे पैलू, खंड २ (२०००)
  • फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा(सप्टेंबर २००७)
  • लोकपालाची मोहिनी(जून २०११)
  • सत्ता आणि शहाणपण(एप्रिल २००५) - लेखसंग्रह