"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदांमधील सहभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[लंडन]] येथे १९३०, १९३१ व १९३२ मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय अशा तीन [[गोलमेज परिषद]]ा आयोजित करण्यात आल्या होत्या. या परिषदांमध्ये [[दलित|बहिष्कृत]] ([[अस्पृश्य]]) वर्गाचे प्रतिनिधित्व [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी केले होते.
 
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar with Sir Muhammad Zafrulla Khan, standing outside the House of Commons when they participated in the 2nd Round Table Conference on Sept. 1931.jpg|thumb|दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतल्यावर हाऊस ऑफ कॉमन्सबाहेर सर [[मुहम्मद झफरुल्ला खान]] यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सप्टेंबर १९३१]]
 
इ.स. १९२७-३० मधील [[सायमन कमिशन|सायमन कमिशनने]] अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सरकार]] भारताला काही राजकीय हक्क [[संविधान|राज्यघटनेच्या]] माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा ''[[भारताचे संविधान|भारताच्या भावी राज्यघटनेत]] [[अस्पृश्यता|अस्पृश्यांच्या]] हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत'' असे बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६५|language=मराठी}}</ref> अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतः च्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. ''अस्पृश्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी [[ब्रिटिश भारत|इंग्रजी सरकारशीही]] व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे,'' असा आंबेडकरांचा विचार होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६६|language=मराठी}}</ref> इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. ''अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताला स्वातंत्र]] मिळावे'' अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.<ref name="auto40">{{स्रोत पुस्तक|title=डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड ४ कालखंड १९२८ ते १९३२|last=खैरमोडे|first=चांगदेव भगवान|publisher=सुगावा प्रकाशन (तृतीय आवृत्ती)|year=जुलै २००३|isbn=|location=पुणे|pages=९४ ते ९५}}</ref> त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही [[समाज|संप्रदायाला]] दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून [[गुलामगिरी|गुलाम]] ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून [[स्वराज्य]] प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.<ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/|title=इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'|date=14 एप्रि, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/editorial/humanitarian-mahatmas-dr-ambedkar/|title=मानवतावादी महापुरुष डॉ. आंबेडकर|date=6 डिसें, 2018|website=Lokmat}}</ref>
 
== पहिली गोलमेज परिषद ==