"रवींद्रनाथ टागोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→जीवनपट: व्याकरण सुधरविले खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 2409:4042:2287:728:0:0:CBE:AD (चर्चा)यांची आवृत्ती 1863809 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६१:
पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
== जीवनपट ==
पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.<ref name="Dutta_1995_109-111">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=109–111}}.</ref> हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.<ref name = "Chakravarty_1961_45"/> आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.<ref name = "Chakravarty_1961_45"/><ref name="Dutta_1995_109">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=109}}.</ref>▼
=== प्रारंभिक आयुष्य (१८६१ - १९०१) ===
[[कोलकाता|कोलकात्याच्या]] जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.{{cref|ε}}<ref name="Dutta_1995_37">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=37}}.</ref> ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ [[कोलकाता|कलकत्ता]] सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), [[अमृतसर]] व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण [[डलहौसी]] इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व [[संस्कृत]] आदींचे अध्ययन केले.<ref name="Dutta_1995_55-56">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=55–56}}.</ref><ref name="Stewart_2003_91">{{harvnb|Stewart|Twichell|2003|p=91}}.</ref>
१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या [[विद्यापती|विद्यापतीप्रवर्तित]] शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.<ref name="Stewart_2003_3">{{harvnb|Stewart|Twichell|2003|p=3}}.</ref> याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.<ref name = "Chakravarty_1961_45"/><ref name="Dutta_1997_265">{{harvnb|Dutta|Robinson|1997|p=265}}.</ref>
[[चित्र:Rabindranath-Tagore-Mrinalini-Devi-1883.jpg|thumb|left|170px|पत्नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ १८८३]]
▲
=== शांतिनिकेतन (१९०१ - १९३२) ===
[[चित्र:Tagore Gandhi.jpg|thumb|right|महात्मा गांधी व रवीन्द्रनाथ (सालः १९४०)]]
१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून [[शांतिनिकेतन]] येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.<ref name="Dutta_1995_133">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=133}}.</ref> रवीन्द्रनाथांच्या पत्नीचा व
१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] प्रतिकात्मक [[स्वराज्य चळवळ|स्वराज्य चळवळीला]] पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.<ref name="Dutta_1995_239-240">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=239–240}}.</ref> ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.<ref name="Dutta_1995_242">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=242}}.</ref><ref name="Dutta_1995_308-309">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=308–309}}.</ref> १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. [[केरळ|केरळच्या]] [[गुरुवायुर मंदिर|गुरुवायुर मंदिरात]] दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.<ref name="Dutta_1995_309">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=309}}</ref>
=== अखेरची वर्षे (१९३२-१९४१) ===
[[चित्र:Tagore Iran.jpg|thumb|left|रवींद्रनाथ (पहिल्या ओळीत डावीकडून तिसरे) [[इराण|इराणी]] [[संसद]] सदस्यांसोबत १९३२ [http://www.flickr.com/photos/nima_flickr/125239520/in/set-909995/].]]
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.<ref name="Dutta_1995_312-313">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=312–313}}.</ref> बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व [[कोलकता|कोलकत्यातील]] भयावह दारिद्र्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव [[सत्यजित रे]] यांच्या [[अपुर संसार]] ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.<ref name="Dutta_1995_335-338">{{harvnb|Dutta|Robinson|1995|pp=335–338}}.</ref><ref name="Dutta_1995_342">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=342}}.</ref> पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', ''श्यामा'' (१९३९), ''चंडालिका'' (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.<ref name=gutenbergchitra>[http://www.gutenberg.org/dirs/etext01/chitr10.txt "Chitra at Project Gutenberg"]{{मृत दुवा}}</ref> याशिवाय ''दुई बोन'' (दोन बहिणी) (१९३३), ''मलंच'' (१९३४), and ''चार अध्याय'' (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या ''विश्वपरिचय'' या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे ''से'' (तो) (१९३७),''तीन संगी'' (१९४०), ''गल्पस्वल्प'' (१९४१).<ref name="ASB_2006">{{harvnb|Asiatic Society of Bangladesh|2006}}.</ref>
[[चित्र:Tagore-THU.jpg|thumb|right|[[इ.स. १९२४]] चिनी विद्वानांसमवेत [[त्सिंग्व्हा विद्यापीठ|त्सिंग्व्हा विद्यापीठात]] टागोर (मध्यात).]]
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते.<ref name="Dutta_1995_338">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=338}}.</ref><ref name="IANS_2005">{{harvnb|Indo-Asian News Service|2005}}.</ref> ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा [[कोलकाता|कोलकात्याच्या]] त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.<ref name="Dutta_1995_363">{{harvnb|Dutta|Robinson|1995|p=363}}.</ref>
== रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र ==
|