"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५:
|पुर्ण नाव=ज्योतिराव गोविंदराव गोर्हे|मुळ गाव=कटगुण ता. खटाव जिल्हा सातारा}}
 
'''जोतीराव गोविंदराव फुले''' (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: '''महात्मा फुले''', '''ज्योतिबा फुले''', हे [[मराठी]] [[लेखक]], विचारवंत आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[सत्यशोधक समाज]] नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, [[अस्पृश्य]] व [[बहुजन]] समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना [[महात्मा]] ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.
 
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.