"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
नवी दिल्लीतील भारतीय [[संसद भवन|संसद भवनाच्या]] मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक [[तैलचित्र]] आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग]] यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref> चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र [[भारतीय संसद|संंसदेस]] भेट दिले होते.<ref name="auto"/><ref name="auto1"/> या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.<ref name="auto"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagranjosh.com/general-knowledge/list-of-portraits-installed-in-central-hall-of-parliament-house-1550041627-1|title=List of Portraits Installed in Central Hall of Parliament House|date=2019-06-20|website=Jagranjosh.com|access-date=2020-07-14}}</ref>
 
भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे]] नेते व खासदार [[बी.सी. कांबळे]] यांनी केली होती. संसदेसोबतच [[राष्ट्रपती भवन]] आणि [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयातही]] बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.<ref>{{जर्नल स्रोत|last=मानकर|first=मिलिंद|date=एप्रिल २०१५|title=बाबासाहेबांची तैलचित्रे : वैभवशाली वारसा|url=|journal=[[लोकराज्य]]|volume=अंक १०वा|pages=१९|via=}}</ref>
 
डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय [[भारत सरकार|भारत सरकारने]] घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री [[रामविलास पासवान]] होते तर पंतप्रधान [[विश्वनाथ प्रताप सिंग|व्ही.पी. सिंग]] होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर '[[भारतरत्‍न|भारतरत्न]]' पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीच्या]] लोकांद्वारे ([[दलित|''दलित'']]) आणि त्यांच्या प्रतिनिधींद्वारे बऱ्याच काळापासून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि, जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/02/ps-krishnan-interview-part-9/|title=जब संसद भवन में आंबेडकर का तैलचित्र लगाया गया : पी.एस. कृष्णन|last=देवी|first=Vasanthi Devi वासंती|date=2019-02-11|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2020-07-14}}</ref>