"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३२:
== इतिहास ==
=== प्राचीन इतिहास ===
[[गौतम बुद्ध|बुद्धांच्या]] हयातीत इसवी सनापूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास बुद्ध धर्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला.<ref>{{Cite book|title=महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास|last=मोरे|first=एस.एस.|publisher=कौशल्य प्रकाशन|year= २००२ (तृतीय आवृत्ती)|isbn=|location=औरंगाबाद|pages=३४ व ४३|language=मराठी}}</ref>
 
बौद्ध धर्माचे संस्थापक, बुद्ध यांनी [[बोधगया]] येथे [[बोधी|संबोधी]] प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धम्मउपदेश देणे सुरु केले. त्यांनी अनेक शिष्य लाभले, ज्यात [[भिक्खू]]-[[भिक्खुणी]][[उपासक आणि उपासिका|उपासक - उपासिका]] यांचा समावेश होता. बुद्धांनी आपल्या शिष्यांना (भिक्खू) कल्याणप्रद अशा आपल्या सद्धम्माचा उपदेश करण्यासाठी चारही दिशांना संचार करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार हजारो भिक्खू भिक्खूणी धम्माचा उपदेश करण्यासाठी ह्या जंबुवदिपातील निरनिराळ्या ठिकाणी गेले. यामुळे महाराष्ट्रात देखील बुद्ध धम्माचा प्रचार प्रचार झाला. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रचार होण्याचे दुसरे एक कारण [[व्यापारी|व्यापारीवर्ग]] होता. सुरुवातीपासून व्यापारीवर्ग तथागतांच्या धम्माकडे आतर्षितआकर्षित झाला होता. जून्या [[पाली भाषा|पाली वाङमयात]] त्यावेळी अस्तित्वात असलेल्या व्यापारी मार्गांबद्दल बरीच माहिती मिळते. महत्त्वाच्या व्यापारी मार्गांपैकी अवन्ती-दक्षिणापथ हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. हा मार्ग उत्तरेकडे महाराष्ट्रातील पैठणपर्यंत व तेथून पुढे दक्षिणेकडे जात होता. धम्म प्रचारक भिक्खुंमुळे व व्यापारी वर्गामुळ्वर्गामुळे बुद्ध हयात असतानाच बुद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता.<ref>{{Cite book|title=महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास|last=मोरे|first=एस.एस.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२००२, तृतीय आवृत्ती|isbn=|location=औरंगाबाद|pages=३४|language=मराठी}}</ref>
 
[[अजिंठा लेणी|अजिंठा लेण्यांची]] निर्मिती इ.स.पू. दुसऱ्या शतकात झाली. [[कार्ले लेणी|कार्ला]], [[भाजे लेणी|भाजा]], [[कान्हेरी लेणी|कान्हेरी]], नाशिक, [[पितळखोरे लेणी|पितळखोर]], [[वेरूळची लेणी|वेरूळ]] आणि [[अजिंठा लेणी|अजिंठा]] ही प्राचीन भारतातील व्यापारी दळणवळणाच्या राज्यमार्गावर वसली होती. त्यामार्गाला सार्थवाहपथ असे म्हटले जात असे. [[चंद्रगुप्त मौर्य|चंद्रगुप्त मौर्याने]] [[गांधार]] प्रदेश जिंकून [[मगध साम्राज्य|मगध राज्याला]] जोडल्यावर [[सम्राट अशोक|अशोकाच्या]] काळात या प्रदेशात बुद्ध धम्माचा व्यापक प्रसार झाला. सम्राट अशोक ह्यांच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा देखील समावेश होता. अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड [[ठाणे जिल्हा|ठाणे]] जिल्ह्यातील [[नालासोपारा|सोपारा]] येथ्येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्यांची प्रांतिक राजधानी होती. सुत्तनिपातातील पारायण वग्गावरुन धम्मप्रचारक भिक्खुंमुळे आणि व्यापाऱ्यांमुळ्व्यापाऱ्यांमुळे बुद्ध हयात असतानाच बौद्ध धम्माचा प्रवेश महाराष्ट्रात झाला होता. इ.स.पू. चौथ्या शतकात [[वैशाली (प्राचीन शहर)|वैशाली]] येथे [[दुसरी बौद्ध संगीती|दुसरी बौद्ध धम्म संगिनी]] भरली होती. अपरांत देशांतून आठ [[अर्हत|अर्हंत]] आणि [[अवंती]][[दक्षिणपथ|दक्षिणापथ]] या देशातून अठ्ठाऐंशी अर्हंत यशाचे निमंत्रण स्वीकारुन वैशालीस गेले होते. बुद्ध धम्माची मते मूळ शुद्ध स्वरुपात रहावीत व धम्माचा प्रचार होण्यासाठी उपाय योजना करावी असे दोन मुख्य उद्देश ही संगीनी भरवण्यामागे होते.
 
[[त्रिपिटक|त्रिपिटकात]] निष्णात असलेले भिक्खू थेर मोग्गलीपुत्ततिस्साने एक हजार विद्वान भिक्खुंना निवडून शुद्ध स्वरुपात धम्म लिहून काढण्यास सांगितले. हे काम नऊ महिने चालले होते. [[तिसरी बौद्ध संगीती|तिसऱ्या धम्म संगितीची]] परिणीती म्हणून धम्म प्रचारासाठी निरनिराळ्या देशांत पाठविण्यात आलेले धर्मोपदेशक होत. त्यात "महारठ्ठ महाधम्म रक्खित थेर नाम कमू" म्हणजे महाधम्म रक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशात कार्तिक महिन्यात पाठविले. इ.स.पू. तिसऱ्या व चौथ्या शतकात महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार झाला होता. [[मौर्य साम्राज्य|मौर्याचा]] आणि [[सातवाहन साम्राज्य|सात वाहनाचा]] काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. त्या वेळच्या वाढलेल्या अधिक संपत्तीचा अविष्कार म्हणजे महाराष्ट्रात निर्माण झालेले कला कौशल्याने युक्त असे अनेक [[विहार|बुद्ध विहार]] योगाचाराचा तत्त्ववेत्ता असंग काही दिवस अजिंठा येथे राहत होता. अजिंठा येथील चित्रकला जवळजवळ एक हजार वर्ष अव्याहत चालली होती. तेथून मध्य प्रदेशातील बाघा, दक्षिणेतील बदमी, सिग्रिया, सित्तनवसाल मध्ये आशियैतीलआशियातील [[बामियान|बामीयान]], [[तिबेट]] आणि [[चीन]] देशांतील तुनऱ्हुआंग येथे तिचा प्रचार झाला. अजिंठा येथे [[शिल्पकला]][[चित्रकला]] शिकवण्याचे विद्यालय होते.
 
महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार [[सातवाहन साम्राज्य|सातवाहन]] काळात फार मोठ्या प्रमाणात झाला असून यात नाग लोकांचे मोठे योगदान होते. पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते भारतातील बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे (लेणी) महाराष्ट्रात सापडतात, ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे त्याकाळी महाराष्ट्र बौद्ध धर्माचे अधिपत्य दर्शविते. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला. बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर अनुसरला जात होता.
 
=== आंबेडकरांची धम्मक्रांती ===