"रिडल्स इन हिंदुइझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ २४:
| पुरस्कार =
}}
'''रिडल्स इन हिंदुइझम''' (मराठी: ''हिंदू धर्मातील कोडे'') हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेला एक इंग्लिश [[ग्रंथ]] आहे. [[इ.स. १९५६]] च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=२९८|language=मराठी}}</ref> पहिल्यांदा [[इ.स. १९८७]] मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने '[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]]' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात ग्रंथकाराने [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] अतार्किक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. मात्र त्यांनी [[राम]]-[[कृष्ण|कृष्णादी]] पौराणिक देवतांवर केलेले विवेचन विवादास्पद ठरले होते. [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदीसह]] अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये ग्रंथ अनुवादित झालेला आहे.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/|title=‘रिडल्स इन हिंदुइझम’चा मराठी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर|date=2 जाने, 2015}}</ref>
 
 
 
== ग्रंथ प्रकाशनावरुन वाद व रिडल्स आंदोलन ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथाने १९८७-८८ च्या दरम्यान वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन लोकप्रिय आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे 'हिंदूधर्मातील ती कोडी' म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी काही सनातनी हिंदू संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने सुरु झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. [[मा.गो. वैद्य]] व [[दुर्गाबाई भागवत]] यांनी ग्रंथावर बंदी घालण्याचे समर्थन केले. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येथे झालेल्या रिडल्स समर्थन परिषद झाली, ज्यात दादासाहेब गवई, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रूपा कुळकर्णी-बोधी व अनेक रिपब्लिकन नेते आलेले होते.<ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/turning-point/articleshow/34259857.cms|title=चळवळीने दिलेलं सर्वांत मोठं भान|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/amp/news/EDT-bhimrao-bansod-article-about-rss-and-dr-5134053-NOR.html|title=संघाला आंबेडकरांचा उमाळा|date=7 ऑक्टो, 2015|website=Dainik Bhaskar}}</ref> 'रिडल्स इन हिंदुइझम' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येण्यापूर्वीच लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी या ग्रंथात राम व कृष्ण यांचा अवमानकारक करणारा मजकूर असल्याचा लेख लोकसत्तातील आपल्या साप्ताहिक सदरात लिहिला. त्यानंतर या ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. दुर्गा भागवत यांनीही लोकसत्तात मोठा लेख लिहून ग्रंथावर टीका केली. ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अरुण कांबळे, राजा ढाले, रूपा कुलकर्णी-बोधी, नामदेव ढसाळ, कुमार सप्तर्षी आदी विचारवंत पुढे आले. राजा ढाले यांनी तर्कशुद्ध मांडणी करीत दुर्गा भागवतांचे लिखाण कसे बाबासाहेबांविषयी पूर्वग्रह दूषित आहे, हे सप्रमाण मांडण्याचा प्रयत्न 'धम्मलिपी' या साप्ताहिकात व अन्य साप्ताहिकांत लेख, मुलाखतीतून केला. हा वाद पेटतच गेला. अखेर सरकारने या ग्रंथातील राम-कृष्ण यांच्याबाबतचे परिशिष्ट मागे घ्यावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा शिवसेनेकडून दम भरण्यात आल्यानंतर दलितांच्या विविध संघटना एकवटल्या व त्यांनी बोरिबंदरपासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवले. त्यानुसार सगळे कार्यकर्ते बोरिबंदर परिसरात जमले व मोर्चाला सुरुवात झाली. २३ नोव्हेंबर १९८७ रोजी सीएसटी (तेव्हाची बोरिबंदर) स्थानकापासून मंत्रालयापर्यंत रिडल्सचा मोर्चा निघाला होता. यात दहा लाख अनुसूचित जातीचे लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण जनता या मोर्चासाठी रस्त्यावर उतरली होती. मजलदरमजल करीत हा मोर्चा लाखोंच्या संख्येने सरकारच्या नावाने घोषणा देत हुतात्मा चौकापर्यंत धडकल्यानंतर काळाघोडा परिसरात हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईचे शिवसेनेचे महापौर असणाऱ्या छगन भुजबळ यांनी गोमूत्राने हुतात्मा चौक परिसर धुवून काढला. <ref>{{Cite web|url=http://prahaar.in/strike-3/|title=रिडल्स मोर्चा : ३० वर्षापूर्वी &#124;|first=Priyanka|last=Gaikwad}}</ref> 'रिडल्स इन हिंदुइझम'वर बंदी घालण्याची मागणी झाल्यानंतर प्रतिकारार्थ आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आंबेडकरी विचारवंतांनी वैचारिक परामर्ष घेतला. त्या ऐतिहासिक लढ्याचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-founder-of-dalit-panther-raja-dhale-passed-away-abn-97-1932287/|title=एक ‘राजा’ बंडखोर!|date=17 जुलै, 2019}}</ref> त्यानंतर मात्र सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.<ref>https: name="auto"//www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/</ref>
 
== हे सुद्धा पहा ==