"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५९७:
* '''दलित चळवळीचा उदय''' :
आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे [[दलित चळवळ]]ीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ [[महार]] लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळींचा विस्तार झाला. दलित चळवळीला आज प्रामुख्याने [[आंबेडकरी चळवळ]] किंवा [[आंबेडकरवादी चळवळ]] म्हटले जाते.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref>
 
== काश्मिर मुद्यावर विचार==
डॉ. [[पी.जी. ज्योतिकर]] यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, [[जम्मू व काश्मिर]]ला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.<ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref> ज्योतिकर आपल्या पुस्तकात लिहितात की, "काश्मीरला विशेष दर्जा देण्याची मागणी [[शेख अब्दुल्ला]] यांनी केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि शेख अब्दुल्ला यांना म्हणाले 'तुमचे म्हणणे आहे की भारताने तुमचे (काश्मिरचे) रक्षण करावे, रस्ते बांधावे, लोकांना धान्य द्यावे. मात्र, भारताचा काश्मिरवर काहीच अधिकार राहणार नाही. हेच तुम्हाला म्हणायचे आहे का?' अशी मागणी मी कधीच मान्य करू शकत नाही." आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी [[गोपाळस्वामी अय्यंगार]] यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.<ref>{{Cite book|title=व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=ज्योतिकर|first=डॉ. पी. जी.|publisher=|year=|isbn=|location=|pages=१५६ व १५७|language=इंग्लिश}}</ref><ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref> जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता [[बलराज मधोक]] यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' नावाने एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे. या पुस्तकात ते लिहितात, "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते."<ref>https://www.bbc.com/marathi/india-49292671</ref>
 
== आंबेडकर स्मारके आणि संग्रहालये ==