"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४७:
[[File:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech.jpg|thumb|एका सभेत भाषण करतांना आंबेडकर]]
आंबेडकरांची राजकीय कारकीर्द इ.स. १९२६ मध्ये सुरू झाली आणि सन १९५६ पर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रातील विविध पदे भूषविली. डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईच्या राज्यपालांनी त्यांना बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे (मुंबई विधानपरिषदे) सदस्य म्हणून नेमले; त्यांनी आपली कर्तव्ये गांभीर्याने घेतली आणि अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते सन १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=273|language=Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.ambedkar.org/ambcd/13A.%20Dr.%20Ambedkar%20in%20the%20Bombay%20Legislature%20PART%20I.htm|title=13A. Dr. Ambedkar in the Bombay Legislature PART I}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=AeGQ8Bnn3XwC&pg=PA231&lpg=PA231&dq=In+1926,+Ambedkar+was+appointed+as+a+member+of+the+Bombay+Legislature&source=bl&ots=by41UAOG17&sig=ACfU3U3_d32QkngHTej8KecSCmneqml_tw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwilwPjQkOnjAhUjH48KHUgDAL4Q6AEwEnoECAoQAQ#v=snippet&q=Dec.+1926+the+Bombay+Legislative+Council&f=false|title=Ambedkar and His Writings: A Look for the New Generation|first=Raj|last=Kumar|date=9 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1920s.html></ref>
 
अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नाहीत याची जाणीव आंबेडकरांना होती. त्यामुळे ते [[इ.स. १९३०]] मध्ये [[लंडन]] येथे भरलेल्या पहिल्या [[गोलमेज परिषद]]ेस
अस्पृश्यांचे प्रतिधीनी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी देशातील अस्पृश्यांच्या परिस्थीतीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटीश सरकारने मान्य केला. परंतु [[महात्मा गांधी]] यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या कल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरम उपोषण सुरू केले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख किंवा अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये [[स्वतंत्र्य मजूर पक्ष|स्वतंत्र्य मजूर पक्षाची]] (इनडिपेनडेन्ट लेबर पार्टी) स्थापन केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref> [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[मुंबई]] विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची' [[इ.स. १९४२]] मध्ये स्थापना केली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>