"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २५३:
आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/news/2011/03/110331_history_this_day_akd|title=इतिहास के पन्नों से : भारत में दलाई लामा, अंबेडकर को भारत रत्न|website=BBC News हिंदी|accessdate=25 अप्रैल 2019}}</ref>
 
पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये "पाकिस्तान" या संकल्पनेचे सर्व बाजूंनी विश्लेषण केले गेले. ज्यात त्यांनी मुस्लिम लिगच्या मुसलमानांसाठी वेगळ्या देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका केली यासोबतच हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.<ref>{{citation |last=Sialkoti |first=Zulfiqar Ali |title=An Analytical Study of the Punjab Boundary Line Issue during the Last Two Decades of the British Raj until the Declaration of 3 June 1947 |journal=Pakistan Journal of History and Culture |volume=XXXV |number=2 |year=2014 |url=http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |p=73–76 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20180402094202/http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |archivedate=2 April 2018 |df=dmy-all }}</ref><ref>{{citation |last=Dhulipala |first=Venkat |title=Creating a New Medina |url=https://books.google.com/books?id=1Z6TBQAAQBAJ&pg=PR2 |date=2015 |publisher=Cambridge University Press |isbn=978-1-107-05212-3 |ref={{sfnref|Dhulipala, Creating a New Medina|2015}} |pp=124,&nbsp;134,&nbsp;142–144,&nbsp;149}}</ref>
 
आंबेडकरांनी आपला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती फेडरेशन) मध्ये बदलताना पाहिला, परंतु सन १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत हा पक्ष उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या (आजचा पश्चिम बंगाल) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले.<ref name="Firstpost 2015">{{cite web | title=Attention BJP: When the Muslim League rescued Ambedkar from the 'dustbin of history' | website=Firstpost | date=15 April 2015 |url=http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | accessdate=5 September 2015 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20150920032027/http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | archivedate=20 September 2015 | df=dmy-all }}</ref>
 
आंबेडकरांनी सन १९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली, परंतु त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर सन १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य (खासदार) झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले (काँग्रेस पक्षाचा विजय). सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते.
 
आंबेडकर दोनदा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य बनले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता, परंतु हा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=5 March 2019}}</ref>
 
बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून "भारतीय रिपब्लिकन पक्ष" स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती, परंतु पक्ष स्थापन करण्यापूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अनुयायी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत [[एन. शिवराज]], यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.<ref>{{Cite book|title=सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर|last=खोब्रागडे|first=फुलचंद|publisher=संकेत प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=नागपूर|pages=२० व २१|language=मराठी}}</ref> १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत डॉ. आंबेडकरांच्या पक्षाचे नऊ सदस्य निवडूण गेले होते. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref>https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/</ref>