"कविसंकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: (निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना क...
(काही फरक नाही)

२०:३८, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

(निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना किंवा काव्यसंकेत :

  1. चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्ये फक्त एक कमळाचे पान असते. पण ती दोघे एकमेकांस दिसत नाहीत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांची भेट होते.
  2. स्त्रीच्या विविध हावभावांनीं पुढील वृक्ष बहरतात असा कविसंकेत आहे. :

स्त्रीच्या स्पर्शें प्रियंगू प्रति आणि बकुला मद्य गंडूषकांनीं ।

पादाघातें अशोका, तिलक-कुरबकांज वीक्षणालिंगनांनीं ॥

मंदारा नर्मवाक्यें, सुरुचिर हंसनें चंपका येई बार ।

आम्रा फुंकें ; नमेरू फुलति कलरवें, नर्तनें कर्णिकार ॥

  1. मृगाचे किडे आषाढात दिसते कीं, पृथ्वी ऋतुस्नात झाली असें समजतात.
  2. ग्रीष्मऋतूच्या (पावसाळ्याच्या) आरंमीं हंस मानस सरोवराकडे जातात.
  3. फक्त मेघजल पिऊनच चातक आपली तहान भागवितो.
  4. अतिशयोक्तींतच कविप्रतिमेचा विलास आहे. असा प्राचीन संकेत आहे.
  5. चंद्रकांत मणी हा त्याच्यावर चंद्रकिरणे पडली की पाझरतो.
  6. कामधेनु ही स्वगींय धेनु. चिंतामणि हें स्वगींय रत्न व कल्पतरु हा स्वर्गीय वृक्ष हे ईप्सितांची परिपूर्ति करणारे आहेत, असा कविसंकेत आहे.
  7. पावसाळ्याच्या आरंमीं पहिली मेघगर्जना झाली कीं कदंब फुलतात.
  8. लोखंडाला परीस नावाच्या मण्याचा (दगडाचा) स्पर्श झाला कीं लोखंडाचे सोने होते.
  9. राजहंस हा दूध आणि पाणी वेगळे करतो.
  10. सत्तावीस तारकांपैकीं कलंकित चंद्राबद्दल एकनिष्ठा ठेवणारी रोहिणीच होती असा कविसंकेत आहे.
  11. ढेकणाच्या रक्ताने हिरा भंगतो. ढेकणाच्या संगें । हिरा तो मंगला । कुसंगें नाडळ । साधु तैसा ॥ (तुकाराम)
  12. स्वाती नक्षत्राच्या पावसाने शिंपल्यांत मोती उत्पन्न होतात.
  13. संध्याकाळची वेळ व पाणवठयाचे स्थळ प्रणयलीलांना अनुकूल मानण्याचा कविसंकेत आहे.
  14. मोती हा पाण्यापासून बनतो त्याचे पुन्हा जर पाणी करावयाचे असेल तर त्याला हंसाची चोंच लागावी असा कविसंकेत आहे. (गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने)
  15. हत्तीच्या गंडस्थळांतून स्रवणाऱ्या मदाचा विशिष्ट सुगंध सेवन करण्याकरिता भ्रमर लुब्ध होतात.
  16. हेमाम्भोज नावाची सुवर्णकमळे फक्त मानस सरोवरांत फुलतात.
  17. अमृताच्या सेवनाने वस्तुमात्राला चैतन्य व चिरजीवन प्राप्त होते. (गाथा सप्तशती)
  18. शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळू लागतात.
  19. सूर्यकांत मणी सूर्यकिरणांच्या संयोगाने पेट घेतो.
  20. सर्व अलंकार असून कपाळी कुंकू नसले तर खरी शोभा नाही, असा कविसंकेत आहे.
  21. घनगर्जितामुळें बगळ्या गर्भवती होतात.
  22. चंपक कलिका रम्य असली व भ्रमर रसिक असला तरी तिच्याजवळ भ्रमर जात नाही.
  23. आज्ञाभंग करणारा व विश्वासघातकी अशा माणसांचा काव्यारंमी नामोल्लेख करू नये.:-

भर्तुराज्ञां न कुर्वन्ति ये च विश्वासघातकाः ।

तेषां नामापि न ग्राह्मं काव्यस्यादौ विशेषतः ॥ (सुभाषित).