"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
 
;संजय पवार यांच्या भाषणातून:
"या तिसर्‍यातिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या."
 
==आतापर्यंतची सम्यक साहित्य संमेलने==
ओळ २०:
* ५वे संमेलन पुणे शहरात १७-१८-१९-२० डिसेंबर २०१५ या काळात झाले. [[रावसाहेब कसबे]] हे अध्यक्ष आहेत. या संमेलनात डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांना डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ब्राह्मणांनी सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले अशी टिप्पणी कसबे यांनी केली. <br/>
साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.
* ६वे सम्यक साहित्य संमेलन २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात होणार आहेझाले.
* एक ६वे सम्यक साहित्य संमेलन ११-१२-१३-१४ जानेवारी २०१८ या काळात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात झाले.. प्रा. [[यशवंत मनोहर]] संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले.होते. संमेलनात भीमशाहिरी गीतांचे कार्यक्रम झाले. संमेलनातील यशवंत मनोहर यांच्या साहित्यिक अध्यक्षीय भाषणाचा सारांश :- "’त्यांच्या’कडे वेगवेगळी शस्त्रे असतील, पण ’आपल्याकडे’ शाहू-फुले-आंबेडकर आणि संविधान आहे. ’पेशवाई’ आणि त्याही आधीच्या व्यवस्थेकडे ’आपल्याला’ ढकलले जात आहे. ’आपल्या’ या शब्दाची व्याख्या विस्तृत करा. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, भटके विमुक्त, आदिवासी, मराठा, डावे, समाजवादी अशा (ब्राह्मण सोडून) सर्वांना समान मुद्द्यांवर आणा, क्रांतीचा कार्यक्रम आणा. हे जर शक्य झाले तर ’आपण’ अराजकाच्या तावडीत सापडणार नाही. देशाचे नवे रूप निर्माण करू शकू. ’संघा’ची ताकद वाढेल अशी ’आपली’ कुठलीही उक्ती किंवा कृती असता कामा नये. उलट ’आपल्या’तले जे लोक ’त्यांच्या’जवळ गेले आहेत त्यांना परत आणा, ’आपल्या’तील ताकद आता गोठू देऊ नका." त्यानंतर यशवंत मनोहर यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधला. राज्य शासनाने भिडे वाड्याचे स्मारक कारवेकरावे नाहीतर पुण्यात मोठी चळवळ उभारण्यात येईल अशी धमकी संमेलनाचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर यांनी दिली.
* ७वे सम्यक साहित्य संमेलन पुणे शहरात २० ते २४ फेब्रुवारी २०१९; संमेलनाध्यक्ष - [[जी.के. ऐनापुरे]])
 
==अन्य माहिती==
 
ही '''सम्यक साहित्य संमेलने''' दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते.