"कमर जलालाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७:
याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले. या पत्रिकेचे खूप नाव झाले. त्याकाळी प्रतिष्ठित सज्जनांच्या पंक्तीत पाय रोवायच्या प्रयत्नात असलेले कवी [[साहिर लुधियानवी]], आणि क़तील शिफ़ाई यांनीही क़मर जलालाबादी यांना मोठेपणा दिला. त्यांनी क़मर यांना पुरेपूर मदत केली. [[साहिर लुधियानवी]] यांनीतर आपल्या काॅलेजातल्या कविसंमेलनासाठी क़मर जलालाबादी यांना लाहोरहून लुधियाना ला बोलावून घेतले.
याच दिवसांमध्ये 'चचा छक्कन' आणि 'अनारकली'चे प्रसिद्ध लेखक सैय्यद इम्तियाज़ अली 'ताज' यांच्या मार्फत क़मर हे लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोलींपर्यंत पोचले आणि त्यांनी पंचोली पिक्चर्सच्या चित्रपटात गीतकाराचे काम मिळवले. पंचोली पिक्चर्सच्या सन १९४२मध्ये निघालेल्या जमींदार या चित्रपटात क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले पहिले चित्रपट गीत 'दुनिया में गरीबों को आराम नही मिलता, रोते हैं तो हँसने का पैग़ाम नही मिलता' जबरदस्त हिट झाले. या गीताला [[गुलाम हैदर|ग़ुलाम हैदर]] यांनी संगीतबद्ध केले होते. या गीताच्या शेवटच्या दोन ओळी - जो कोई भी आता है ठोकर ही लगाता है, मरके भी गरीबों को आराम नही मिलता - या तत्कालीन शायर बहज़ाद लखनवी यांनी सुचवल्या होत्या, म्हणून चित्रपटाच्या श्रेयनामावलीत गीताकार म्हणून त्यांचेही नाव आहे.
{{DEFAULTSORT:कमर जलालाबादी}}
|