"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
 
==इतिहास व पार्श्वभूमी==
{{Main|भारतीय रिपब्लिकन पक्ष|भारिप बहुजन महासंघ}}
 
इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी [[भारिप बहुजन महासंघ]] या राजकीय पक्षाची स्थापना केली.<ref>The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.</ref> हा पक्ष [[बाबासाहेब आंबेडकर]]ांचा वारसा लाभलेल्या [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचा एक गट होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-04-22}}</ref> आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/|शीर्षक=Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती|last=Sat|पहिले नाव=सुधीर महाजन on|last2=March 30|दिनांक=2019-03-30|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-04-22|last3=2019 9:22pm}}</ref>
 
२०१४ मध्ये झालेल्या १६व्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी [[भारिप बहुजन महासंघ]]ाच्या तिकीटावर राज्यात २३ उमेदवार उभे केले होते, मात्र सर्वांचा पराभव झाला. त्यांना एकत्रित ३,६०,८५४ (०.७%) मते मिळाली होती.<ref>{{Cite web|url=http://www.indiavotes.com/party/state_info?eid=241&type=pc&partylist=Bharipa+Bahujan+Mahasangh+%5BBBM%5D&radioselection=pc&state=30|title=IndiaVotes PC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh Maharashtra|website=IndiaVotes|access-date=2019-05-25}}</ref> २०१४ मध्ये झालेल्या १३व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर ७० उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी केवळ एकच उमेदवार विजयी झाला. सर्व उमेदवारांना एकत्रित ४,७२,९२५ (०.९%) मते मिळाली होती.<ref>{{Cite web|url=http://www.indiavotes.com/party/ac_info/380/241/30|title=IndiaVotes AC: Party peformance over elections - Bharipa Bahujan Mahasangh|website=IndiaVotes|access-date=2019-05-25|archive-url=https://web.archive.org/web/20190421182837/http://www.indiavotes.com/party/ac_info/380/241/30|archive-date=2019-04-21|dead-url=no}}</ref>
 
१ जानेवारी २०१८ रोजी [[पंढरपूर]] येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168|शीर्षक=भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा|last=अकोला|पहिले नाव=उमेश अलोणे, एबीपी माझा|दिनांक=2019-03-14|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> जून २०१८ मध्ये, [[लक्ष्मण माने]], हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या [[प्रकाश आंबेडकर]] यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर [[मे २०|२० मे]] [[इ.स. २०१८|२०१८]] रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms|शीर्षक=आता आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी|दिनांक=2018-06-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे [[औरंगाबाद]]चे आमदार [[इम्तियाज जलील]] यांनी एआयएमआयएम चे अध्यक्ष व खासदार [[असादुद्दीन ओवैसी]] यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एआयएमआयएम]] पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress|शीर्षक=महाराष्ट्र: प्रकाश आम्बेडकर और ओवैसी का गठबंधन, कांग्रेस का नुकसान?|संकेतस्थळ=The Quint Hindi|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला [[शेतकरी]], कामगार, युवक, [[आरक्षण]] अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात ''सत्ता संपादन मेळावे'' घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन|दिनांक=2019-02-20|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref>