"सुनील चिंचोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; मृत्यू : २२ एप्रिल २०१८) हे शि...
(काही फरक नाही)

२१:५३, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

सुनील चिंचोलकर (जन्म : १४ मार्च १९५१; मृत्यू : २२ एप्रिल २०१८) हे शिवाजीराव पटवर्धन यांचे विद्यार्थी होते. शाळा-काॅलेजचे पुरेसे शिक्षण झाल्यावर त्यांनी शिवाजीराव पटवर्धन यांना विचारले की 'आता मी पुढे काय करू?' प्राचार्य भोसले यांनी त्यांना सज्जनगडचा रस्ता दाखवला.

सुनीलने सज्जनगडावर वीस वर्षे राहून साधना आणि अध्ययन केले. त्याची परिणती म्हणून ते समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचे प्रचारक झाले. त्यांनी दासबोधावर कीर्तने आणि प्रवचने करायला सुरुवात केली, आणि त्याचवेळी व्यासंगपूर्ण पुस्तके लिहिली.

रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील शिकवण सशक्त राष्ट्र उभारणीसाठी आजही उपयुक्त आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी अगदी कमी किंमतीत दासबोधाची आवृत्ती काढण्याची चिंचोलकरांची खूप इच्छा होती. चिंचोलकरांच्या मृत्यूनंतर डाॅ. अशोक कामत यांनी चांगला कागद. चांगली छपाई, चांगली मांडणी, चांगली पुस्तक-बांधणी यांसह हा ग्रंथ फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून दिला आणि आपल्या मित्राची इच्छा पूर्ण केली. या ग्रंथाच्या शेवटी विस्तृत शब्दकोश दिला आहे.

आजच्या संदर्भात दासबोध

समर्थ भक्तीतून सुनील चिंचोलकरांनी समर्थांची शिकवण लोकांपर्यंत विविध प्रकारची ग्रंथरचना सोप्या मराठीत केली. ती अशी :-

  1. दासबोधाच्या पहिल्या तीन दशकांवर अभ्यासपूर्ण विवेचन-मार्गदर्शन असलेला बृहद्‌ग्रंथ (५१८+१४ पृष्ठे, काॅन्टिनेन्टल प्रकाशन)