"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६:
 
==निर्मिती==
या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन गणेश रासने करत आहेत. १८ मे २०१९ रोजी [[बुद्ध जयंती]]चे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला आहे. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे. ही मालिका इतिहासकार [[चांगदेव भवानराव खैरमोडे]] यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित असली तरी या मालिकेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांमधील किमान ८०० पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर|last=author/online-lokmat|दिनांक=2019-02-18|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर: छोट्या पडद्यावर उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट|संकेतस्थळ=Maharashtra Times|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms|शीर्षक=A new show based on the life of Babasaheb Bhimrao Ambedkar to go on-air soon - Times of India|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref>
 
आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, ''"एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या [[चैत्यभूमी]], नागपूरच्या [[दीक्षाभूमी]] यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर [[भारताचे संविधान|संविधान]] लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे."''