"सानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
==पूर्वायुष्य==
सानिया (जन्म : सांगली, १० नोव्हेंबर १९५२) यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी.
शिक्षण संपल्यावर सुनंदा कुलकर्णी यांनी मुंबईतील होल्हास कंपनीत (?) काहीकाळ नोकरी केली, त्यावेळी त्यांचे ओळख व मैत्री बलराम यांच्याशी झाली. बलराम यांचे कुटुंब ते एक वर्षाचे असताना कराचीहून निर्वासित होऊन बेंगलोरला आले होते. लग्नानंतर सुंनंदा कुलकर्णी ह्या सुनंदा बलराम कुलकर्णी झाल्या. नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने सानिया ह्यांचे जपान, मद्रास, बेंगलोर, भुवनेश्वर आदी शहरांत/देशात वास्तव्य झाले.
==लेखन==
शाळेत असताना सुनंदा कुलकर्णी यांनी पहिली कविता लिहिली. काॅलेजात कविता-कथा लिहीत लिहीत, त्या कादंबऱ्या व ललितलेखनापर्यंत पोचल्या.
१९६८ साली ’हरवलेली पाऊलवाट’ ही त्यांची पहिली [[कथा]] ’श्री’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते१९७५ या काळात सानियांच्या [[कथा]] ’स्त्री’, ’मनोहर’, ’किर्लोस्कर’, ’युगवाणी’ आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. सन १९७५नंतर ’सत्यकथा’, ’मौज’ या मासिकांतून केलेले त्यांचे कथालिखाण लक्षणीय ठरले. पुढे ’हंस’, ’दीपावली’, ’साप्ताहिक सकाळ’, ’मिळून साऱ्याजणी’, ’माहेर’, ’कालनिर्णय’, ’अक्षर, ’अनुभव’ आदी नियतकालिकांमधून सानियांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इ.स. २०१४पर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Line २८ ⟶ २९:
* पुन्हा एकदा (कथासंग्रह-२०१५)
==संदर्भ==
* सानिया, प्रवास (राजहंस प्रकाशन, २००९)
* सानिया, वाटा आणि मुक्काम (मौज [प्रकाशन, २००९)
[[वर्ग:मराठी लेखिका]]
|