"सानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
सानिया या मराठीतील एक कथालेखिका आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळत आशयघन आणि प्रयोगशील असे लेखन त्यांनी केले आहे.
==पूर्वायुष्य==
सानिया (जन्म : सांगली, १० नोव्हेंबर १९५२) यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी. वडलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांचे शिक्षण अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथील सहा शाळा आणि तीन काॅलेजांतून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.काॅम.ची पदवी १९७२ साली, तर एम.काॅम.ची पदवी मुंबई विद्यापीठातून १९७४ साली घेतली.
शिक्षण संपल्यावर सुनंद कुलकर्णी यांनी मुंबईतील हॊल्हास कंपनीत (?) काहीकाळ नोकरी केली, त्यावेळी त्यांचे ओळख बलरामन यांच्याशी झाली. लगनानंतर सुंनंदा कुलकर्णी सुनंदा बलरामन झाल्या. त्याच्या नोकरीच्या निमित्ताने सानिया ह्यांचे जपान, मद्रास, बेंगलोर, भुवनेश्वर आदी शहरांत/देशात वास्तव्य झाले.
==लेखन==
१९६८ साली ’हरवलेली पाऊलवाट’ ही त्यांची पहिली [[कथा]] ’श्री’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्याने कथालेखन केले. १९६८ ते१९७५ या काळात सानियांच्या [[कथा]] ’स्त्री’, ’मनोहर’, ’किर्लोस्कर’, ’युगवाणी’ आदी नियतकालिकांत प्रकाशित झाल्या. सन १९७५नंतर ’सत्यकथा’, ’मौज’ या मासिकांतून केलेले त्यांचे कथालिखाण लक्षणीय ठरले. पुढे ’हंस’, ’दीपावली’, ’साप्ताहिक सकाळ’, ’मिळून साऱ्याजणी’, ’माहेर’, ’कालनिर्णय’, ’अक्षर, ’अनुभव’ आदी नियतकालिकांमधून सानियांच्या कथांना विशेष प्रसिद्धी मिळाली. इ.स. २०१४पर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
|