"दासो दिगंबर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ २०५:
 
== साहित्यरचना ==
यांनी गीतेवर टीका लिहिली असून भगवद्गीतेवरील चार-पाच टीका, गीतार्णव (भगवद्गीतेवरील सव्वालक्ष ओव्यांची टीका), गीतार्थ-चंद्रिका, ग्रंथराज, प्रबोधोदय, पदार्र्णवपदार्णव असे ग्रंथ आहेत.त्यांत प्रत्येकी सवा लाख ओव्या आहेत.त्याची रचना सुबोध,रसाळ आणि दृष्टान्तादिकांनी भरलेली आहे."पंचीकरण" हा पासोडीवर लिहिलेला ग्रंथ अद्यापि उपलब्ध आहे असे म्हणतात. पासोडी म्हणजे एक प्रकारचे दुहेरी जाड कापड. दासोपंतांनी लिखाण करण्यासाठी या पासोडीचा उपयोग केला. ही पासोडी ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. त्यवर भरपूर लिखाण केलेले आहे. उदा० शेजारील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एकमुखी, सहा हात असलेल्या दत्तमूर्तीच्या चित्रामध्ये ओव्या गुंफल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रातून त्यांनी अध्यात्मातील 'पंचीकरण' ही संकल्पना स्पष्ट केली आहे.
 
ईश, केन व कठ उपनिषदांवर संस्कृत टीकाही दासोपंतांनी लिहिल्या आहेत. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, तेलु्गू व कन्नड भाषेत त्यांच्या गीत रचनागीतरचना आहेत. त्यांनी त्या त्या प्रदेशांतील अभिजात संगीताचा अभ्यास करून, त्याआधारे तब्बल ८६ राग आणि ११ ताल निर्माण करून संगीतशैली विकसित केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१८ जुलै, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238463:2012-07-17-18-30-54&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=सुहास सरदेशमुख | शीर्षक=दासोपंतांच्या ‘पासोडी’ला वाचवा हो!{{मृत दुवा}} | ॲक्सेसदिनांक=१८ जुलै, २०१२}}</ref>
 
या शिवाय दासोपंतांची पदे, कूटे, भारुडे, इ. रचना विपुल आहेत. त्याची काही पदे रागदारीत आळविण्याजोगीही आहेत. संस्कृत पंडित असूनही त्यांचा मराठीविषयीचा अभिमान जाज्वल्य होता.
 
"संस्कृत बोलणे सेविणे|तेंचि सांडावी प्रकृत वचने|ऐसिया मूर्खा मुंडणे|किती आता||"असे ते म्हणतात. संस्कृतापेक्षा मराठी न्यून नाहीच उलट मराठीत एकेका गोष्टीकरिता जी बहुविध शब्दसंपत्ती आहे, तशी संस्कृतात कोठे आहे? असे संस्कृतवादी आणि प्राकृतवादी यांच्या संभाषणात्मक एक कथानक रचून मुद्देसूद रितीने दासोपंतांनी संस्कृतवादी मतांचे खंडन केले आहे. त्याचा मासला पुढे उतार्‍यातउताऱ्यात दिला आहे.
 
{{cquote|
ओळ २२४:
}}
 
त्यांनी मातीचे ११२ प्रकार नोंदवून ठेवले आहेत. या संतसाहित्याची वाङ्मयीन ओळख मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे पहिले विभागप्रमुख [[वा. ल. कुलकर्णी]] यांनी करून दिली.
 
== रचलेले ग्रंथ ==