"नारायण मेघाजी लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रावबहाद्दुर '''{{लेखनाव}}''' (जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, [[इ.स. १८९७]]) हे एक [[भारत|भारतीय]] कामगार पुढारी होते.
 
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर. फुलमाळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी [[बाँबे मिलहँड्‌स असोसिएशन|बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन]] ही गिरणी कामगार संघटना [[सप्टेंबर २३]], [[इ.स.सप्टेंबर 1884]]१८८४ रोजी स्थापली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
 
इंग्रजांच्या काळात कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागे. आठवड्यात हक्काची एकही सुटी त्यांना मिळत नसे. लोखंडे यांनी इंग्रजांसमोर रविवार हा खंडोबा या देवाचा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी, असा प्रस्ताव मांडला. त्यांनी सतत सात वर्षे रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. शॆवटी लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल इंग्रजांना घ्यावी लागली. मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.
 
लोखंडे हे [[महात्मा फुले|महात्मा फुल्यांनी]] स्थापलेल्या [[सत्यशोधक समाज|सत्यशोधक समाजाच्या]] मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.