"पांडुरंग वामन काणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==पूर्वेतिहास==
कोकणातील वेदशास्त्रपारंगत अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून त्यांनी खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाला वेदान्त पारितोषिकासह एम.ए. आणि ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. त्यामध्ये व्ही.एन.मंडलिक सुवर्ण पदक. हे त्यांचे शिक्षण.
 
१९०४ साली [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास काणेंनी सुरूवातसुरुवात केली. नंतर ते एल्फिंस्टनएल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. पुढेमुंबईच्याच तेगव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू झालेहोते.
 
==ग्रंथलेखन==
प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हा सुद्धाहासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. त्यांचे प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.
 
==समजसुधारणा==
समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंची वैशिष्ट्ये म्होती.
 
भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.
 
विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते.
 
आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां.वा. काण्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.
 
==पां.वा. काण्यांच्या पुढील पिढ्या==
Line २८ ⟶ ३७:
* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले.
* 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
* 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँडअॅन्ड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.
 
{{भारतरत्न}}