"हरिशंकर परसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हरिशंकर परसाई (जन्म : जमानी-हुशंगाबाद (मध्य प्रदेश), २२ आॅगस्ट १९२४; मृत्यू : जबलपूृर, आॅगस्ट १९९५) हे एक हिंदी विनोदी लेखक आणि वक्ते होते. ते नागपूर विद्यापीठाचे एम.ए.(हिंदी) होते.
 
वयाच्या १८व्या वर्षी ते जंगल खात्यात नोकरीला लागले, पुढॆ ६ महिने त्यांनी खांडव्याला शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४१-४३ या काळात त्यांनी जबलपूर येथून बी.टी. केले. तत्पूर्वीच, म्हणजे १९४२पासून त्यांची तेथील माॅडेल हायस्कूलमध्ये अध्यापकाची नोकरी सुरू झाली होती. सन १९५२मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली १९५३ ते १९५७ या काळात खासगी शाळेत शिकवले. १९५७मध्ये हीही नोकरी सोडून ते पूर्णवेळ लेखक बनले, त्यासाठी त्यांनी जबलपुरात वसुधा नावाचे साहित्यप्रधान मासिक काढले. याशिवाय त्यांचे 'नई दुनिया'मधून 'सुनो भइ साधो','नयी कहानियों'मधून 'पाँचवाँ कालम' और 'उलझी–उलझी' आणि 'कल्पना'मधून 'और अन्त में' आदी सदरे, ललित लेख, कादंबऱ्या इत्यादी प्रसिद्ध होऊ लागले त्यांमधूनच हरिशंकर परसाई विनोदी लेखक म्हणून ख्यातनाम झाले.
 
==हरिशंकर परसाई यांचे कथासंग्रह आणि कादंबऱ्या==