"नुक्कड साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यामध्ये ‘बुक हंगामा’तर्फे ६ मे २०१७ पासून दोन दिवसाचे नुक्क...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पुण्यामध्ये ‘बुक हंगामा’तर्फे ६ मे २०१७ पासून दोन दिवसाचेदिवसांचे नुक्कड साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन [[विनोद तावडे]] करणार आहेत. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे विवेक सावंत आणि डॉ. माधवी वैद्य यांची संमेलनाला हजेरी असेल.
 
या संमेलनाच्या पहिल्या दिवशी २० डिजिटल पुस्तकांचे प्रकाशन होईलझाले.
 
* २रे नुक्कड साहित्य संमेलन औरंगाबाद येथे सहा व सात जानेवारी २०१८ या काळात झाले. हे संमेलन रेल्वे स्टेशन रोडवरील पुष्पक सभागृहात झाले. संमेलनात फेसबुक आणि सोशल मीडियावर साहित्य लेखन करणारे सहभागी झाले होते. बुकहंगामाचे सहसंस्थापक विक्रम भागवत हे या संमेलनाचे संयोजक होते.
 
संमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस ई-बुके व जवळपास साठ ऑडियो बुके यांचे प्रकाशन करण्यात आले. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ‘कथा आशय आणि विषय व आकृतीबंध’ यावर चर्चासत्र झाले. या सत्रात गणेश कनाटे, शशी डंभारे, संजन मोरे, मेघा देशपांडे, विनया पिंपळे, शिरीष कुलकर्णी, सुवर्णा पावडे, डॉ. माधवी वैद्य हे प्रमुख वक्ते होते. नुक्कड पुरस्कर वितरण कार्यक्रमाला डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड, रा. रं. बोराडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. सायंकाळी बहिणाबाईंच्या कविता हा कार्यक्रम डॉ. माधवी वैद्य व कलाकार यांनी सादर केला.