"भागोजी कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भागोजी बाळू कीर हे मुंबईतील एक उद्योगपती होते. भंडारी समाजाचे ते...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
लायन्स गार्डन, सेंट्रल बँक बिल्डिंग, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट्स चेंबर्स, मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक बिल्डिंग या मुंबईतील सर्व इमारती बांधण्यात भागोजीचा हात आहे. मरीन ड्राइव्हची समुद्र रोखणारी काँक्रीटची भिंतही त्यांनीच बांधली.
 
भागोजी कीर हे ते गाडगेमहाराजांना आध्यात्मिक गुरू मानत. त्यांच्या सांगण्यावरून भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले. भागोजी कीर यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये हाती घेतली. एक शेतमजुराचा मुलगा, श्रीमान भागोजीशेठ कीर झाला.
 
भागोजींना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नव्हते. त्यामुळे गरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणाची आपल्याप्रमाणे परवड होऊ नये म्हणून त्यांनी १९२९ साली रत्नागिरीत शाळा बांधली. रत्नागिरीत त्या वेळी स्वातंत्र्यवीर. सावरकर ब्रिटिशांच्या ‘नजरकैदेत’ होते. त्यांना राजकारणात भाग घेता येत नव्हता. सावरकरांनी समाजकारण करायचे ठरवले. त्यासाठी मदतीचा आणि पैशाचा हात भागोजी कीरांनी पुढे केला.
 
==भागोजी कीर यांना मरणोपरान्त मिळालेले सन्मान==
* मुंबईत दमाहीम येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.
* दादर स्मशानभूमीला भागोजी कीर स्मशानभूमी म्हणतात.
* या स्मशानभूमीच्या कडेला भागोजींचा अर्धपुतळा आहे.
* रत्‍नागिरीतील एका शाळेला भागोजी कीर यांचे नाव दिले आहे.
 
(अपूर्ण)