साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.
* ६वे सम्यक साहित्य संमेलन २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात होणार आहे.
* एक सम्यक साहित्य संमेलन ११-१२-१३-१४ जानेवारी २०१८ या काळात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहेझाले.. प्रा. [[यशवंत मनोहर]] संमेलनाध्यक्ष असतीलहोते. हे संमेलन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात येईल. संमेलनात भीमशाहिरी गीतांचे कार्यक्रम होतील. संमेलनातील यशवंत मनोहर यांच्या साहित्यिक अध्यक्षीय भाषणाचा सारांश :- "’त्यांच्या’कडे वेगवेगळी शस्त्रे असतील, पण ’आपल्याकडे’ शाहू-फुले-आंबेडकर आणि संविधान आहे. ’पेशवाई’ आणि त्याही आधीच्या व्यवस्थेकडे ’आपल्याला’ ढकलले जात आहे." त्यानंतर यशवंत मनोहर यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधला.