"असंही एक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''असं ही एक साहित्य संमेलन''' या नावाचे एक साहित्य संमेलन ७ मार्च२०१३ रोजी मुंबईत दादरला शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाले. नाट्य व्यवस्थापक अशोक
संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा.प्रतिमा इंगोले तर उद्घाटक न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी होते. कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी मराठे यांनी केले; ध्वनिसंयोजक प्रशांत लळीत होते.
संमेलनात झालेले अन्य कार्यक्रम -
* ’बोला हमो बोला’ - [[ह.मो.मराठे]] यांची रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांनी घेतलेली सडेतोड मुलाखत.
* किती किती गोड - [[राजा बढे]] यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम. सादरकर्ते : अद्वैत लोणकर, जयंत पिंगुळकर, नीलिमा गोखले, [[बकुळ पंडित]], श्रीरंग भावे वगैरे.
==दिवाळी अंकांच्या लेखकांसाठी साहित्य संमेलन==
'''असं ही एक साहित्य संमेलन''' या नावाचे आणखी एक साहित्य संमेलन २५ डिसेंबर २०१७ रोजी मुंबई दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाले. 'ऋतुरंग'कार [[अरुण शेवते]] या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनात दिवाळी अंकांत लिहिणारे लेखक, मुख्य प्रवाहात नसलेले नवोदित लेखक आणि एखाददुसरी कथा-कविता लिहिणारे लेखक-कवी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. हेही संमेलन रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी भरवले होते.
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]
|