"रुस्तुम अचलखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब ''' (जन्म : इ.स. १९४४; मृत्यू : २५ ऑक्टोबर २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. [[जालना]] जिल्ह्यातले मानेगाव हे त्यांचे मूळ गाव. मोठ्या
अचलखांब हे [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात]] [[नाट्यशास्त्र]] विभागाचे
==लोकनाट्य, तमाशा यांवरील संशोधन==
डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या पण मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींवर संशोधन केले आणि तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन, तमाशातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर संशोधनपूर्ण लेखन केले. [[भाऊ फक्कड]], शिवा-संभा, भाऊ-बापू आणि [[पवळाबाई]] यांनी शाहिरीची परंपरा समृद्ध केली, हे मानणारा आणि त्याचे श्रेय जाहीरपणे सांगणाऱ्यामध्ये अचलखांब मराठवाड्यात अग्रभागी होते.
[[पठ्ठे बापूराव]] यांची दुसरी पत्नी [[पवळा]] हिच्यावर अचलखांब यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. लोककलावंत दुर्लक्षित होऊ नये, त्यांची कला जिवंत राहायला हवी, तिच्यातील माणसे सांस्कृतिकदृष्टय़ा अधिक प्रगल्भ असतात असे अचलखांब यांनी दाखवून दिले.
दुर्लक्षित कलाकरांना शोधणे, ते म्हणत असणारे काव्य, त्याच्या चाली याच्या नोंदी करून घेणे, त्या चाली आणि ती कला जशास तशी मध्यमवर्गीय माणसापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी संगीत मनमोहन नावाचा प्रयोग केला. सुयॊग्य कलावंत जमा करून त्यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये 'मनमोहन'चे मेहनतपूर्वक सादरीकरण केले.
==मराठी नाट्यसृष्टीतील कामगिरी==
रुस्तम अचलखांब यांनी साहित्य आणि नाट्यक्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग लक्षणीय आहेत. त्यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांत संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. [[महात्मा फुले]] यांनी लिहिलेल्या 'तृतीयरत्न' या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला होता. त्यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. त्या लोकनाट्यातला त्यांनी साकारलेला सावळा कुंभार हा अनेकांच्या स्मरणात आहे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
शिवरायांचा आठवावा प्रताप' या नाटकातून अचलखांब यांनी गोंधळ, भारूड या माध्यमातून शिवाजी महाराज समजावून सांगितले होते.
|