"वसुबारस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ २:
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.
ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.<ref>[http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/vasubaras/ वसुबारस पूजेचे महत्त्व]</ref>
या दिवशी पौर्णिमान्त पंचांगाप्रमाणे कार्तिक महिना असतो.
याच दिवशी गुरुद्वादशी असते. शि़ष्यमंडळी [[गुरु पौर्णिमा|गुरु पौर्णिमेप्रमाणे]] याही दिवशी गुरूचा आदरसत्कार करतात.
==संदर्भ==
|