"भाऊराव पायगौंडा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५६:
== चरित्र ==
 
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा [[जन्म]] [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील [[कुंभोज]] या गावी जैन कुटूंबातकुटुंबात झाला. [[सांगली]] जिल्ह्यातील [[ऐतवडे बुद्रुक]] हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनचत्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नादणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे. एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे [[प्राथमिक शिक्षण]] [[सांगली]] जिल्ह्यातील [[विटा]] याआणि इतरही काही गावीगावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या [[राजाराम हायस्कूल]]मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय [[जैन बोर्डिंग]]मध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
 
=== रयत शिक्षण संस्था ===
ओळ ७३:
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
 
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, [[इ.स. १९२७]] रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. [[जून १६]], [[इ.स. १९३५]] रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणार्‍या समारंभाचे आमंत्रण दिले.
 
त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. [[इ.स. १९४७]] साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर [[इ.स. १९५४]] साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे [[इ.स. १९५५]] मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
 
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा ''कर्मवीर'' ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाने]] त्यांचा [[इसवी सन १९५९]]मध्ये सन्माननीय [[डी. लिट.]] ही पदवी दिली होती.<ref name="सातारा">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://satara.nic.in | शीर्षक = सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ - प्रभावशाली व्यक्ती | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
[[ श्री. ह. रा. महाजनी]] यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, [[इ.स. १९५९]] रोजी मालवलमालवली.
 
==रयतगीत==