"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ४७५:
# आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
# इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
जे नवबौद्ध या २२ प्रतिज्ञाच्या विपरीत असे काम करतील त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची धमकी बौद्ध संस्थांकडून देण्यात येते. २०१७ सालच्या गणपती उत्सवात ज्यांनी ज्यांनी घरात गणपती बसविले त्यांना धमक्यांना तोंड द्यावे लागले.
ज्यांना फोनवर किंवा अन्य मार्गाने धमक्या मिळाल्या अशा काहींची नावे :
* सुशील दामोदर इंगोले (ज्योतिनगर हिंगोली) : हे शाळेत शिक्षक आहेत, यांनी २०१६ साली शाळेच्या गणेशोत्सवात भाग घेतला होता. त्यांना २६ ऑगस्ट २०१७ पासून फोनवर व अन्य सोशल मीडियावर धमक्या येणे व शिवीगाळी सुरूच आहे. पोलीसात तक्रार नोंदवली आहे.
* हिंगोलीमध्ये काही तरुणांनी ‘गणपती शोध मोहीम’ चालवली आहे. जे नवबौद्ध घरात गणपती ठेवतील त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे संदेश अन्य बौद्धधर्मीयांना जातात.
* भाऊ कदम (मराठी अभिनेता) : ह्यांनी घरात एक ‘वृक्ष गणपती’ ठेवला. हा धर्मद्रोह असल्याचे सांगत त्याचे कार्यक्रम पाहू नयेत असे आदेश अन्य बौद्धांना दिले जात आहेत. भाऊ कदमने बौद्ध समाजाची बिनशर्त माफी मागून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
* दशरथ जगताप (अंबरनाथ) : ह्यांनी घरात गणपती ठेवल्याबद्दल त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या (BBMच्या) कार्यकर्त्यांनी घरी जाऊन धमकावले. त्यानंतर नियमित रीत्या धमकीचे फोन येणे सुरू झाले .जगताप यांनी लुंबिनी बुद्ध विहारमध्ये जाऊन त्यांच्या लेटरपॅडवर लेखी माफी लिहून दिली आहे. त्यानंतरही धमकीचे फोन येतच राहिले.
* अभय साबळे (नवी मुंबई) : हे अनेक वर्षे घरात गणपती बसवतात. २०१७ सालच्या गणपती उत्सवानंतर त्यांना धमक्या आणि त्यांच्या पत्नीला असभ्य भाशेत संदेश येऊ लागले.
(अपूर्ण)
== महापरिनिर्वाण ==
|