"वसुधा सरदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वसुधा सरदार''' या मराठी समाजसेवक आहेत. या [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातल्या]] [[दौंड तालुका|दौंड तालुक्यातील]] [[पारगाव]] येथील ''नवनिर्माण न्यास''च्या कार्यकारी विश्वस्त आहेत. या न्यासामार्फत परिसरातील १० गावांमध्ये ''मुक्तशाळा'' चालवण्यात येते तसेच १५ गावांमध्ये २०० बचत गटांमार्फत महिला विकासाचे, प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. दारूमुक्तीसाठी विविध मार्गानी चळवळ उभारणी केली जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ पासून सेंद्रिय शेतीच्या अवलंबासाठी प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. त्यापूर्वीही युक्रांदच्या माध्यमातून, स्त्री चळवळींच्या माध्यमातून वसुधा सरदार यांनी सामाजिक कार्य केले. त्यांच्या शेतीविषय आणि अन्य सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार प्रदान झाले आहेत.
 
==पूर्वेतिहास==
वसुधा सरदार यांचे बालपण मुंबईतील दिंडोशी-गोरेगांव भागात गेले. ते गाव तेव्हा खेडे होते. वसुधाबाई इंटरला जाईपर्यंत गावात वीज नव्हती. त्यांचे वडील (आबा), मृणाल गोरे आणि बाबूराव सामंत यांसारखे सामाजिक कार्यकर्ते गावात रहात. त्यांचा घरात राबता असे. ते पाहून वसुधा सरदार यांना सामाजिक कार्याची ओढ वाटू लागली.
 
वसुधा सरदार मॅट्रिक झाल्या त्यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत बाबा आमटे यांनी जी पहिली ‘श्रमसंस्कार छावणी’ आयोजित केली होती, तिच्यात ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’तर्फे वसुधाबाई आणि गावातली पंधरा-वीस मुले सामील झाली होती. सकाळी सपाटून काम आणि दुपारी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने-चर्चा चालत. या पंधरा दिवसांच्या अनुभवाने वसुधाबाईंनी पुढच्या आयुष्यात सामाजिक काम करायचे हे नक्की झाले..
 
 
==पुरस्कार==