"अनुराधा गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अनुराधा विष्णू गोरे (जन्म : इ.स. १९५०?) या एक मराठी साहित्यिक आहेत. त...
(काही फरक नाही)

००:५४, ३१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

अनुराधा विष्णू गोरे (जन्म : इ.स. १९५०?) या एक मराठी साहित्यिक आहेत. त्या मूळच्या सातार्‍याच्या आहेत. अनुराधा गोरे ह्यांनी मराठीत सुमारे आठ पुस्तके लिहिली आहेत. अनुराधा गोरे मुंबईत विले पार्ले येथे एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा मुलगा कॅप्टन विनायक विष्णू गोरे हा २६ सप्टेंबर १९९५ रोजी भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे भारत-पाकिस्तान युद्धात मरण पावला. तेव्हा त्याचे वय २६ वर्षाचे होते.

मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा गो्रे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले. त्यांच्या व्याख्यानांमुळे स्फूर्ती घेऊन अनेक तरुण सैन्यात भरती झाले.

अनुराधा गोरे यांची बहुतेक पुस्तके सैन्य आणि सैनिक यासंबंधी आहेत. त्या जानेवारी २०१७ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.

अनुराधा गोरे यांनी लिहिलेली (काही) पुस्तके

  • ओळख सियाचीनची
  • वारस होऊ अभिमन्यूचे (२००९) : या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाले आहे.
  • शौर्य