"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १९३२|१९३२]] - हयात) हे [[मराठी]] वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)
 
वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. ६५वर्षेनोकरीदरम्यान आणि त्यानंतही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.
 
==बालपण==
ओळ ४०:
 
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्‍या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोइल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले [[रंग|रंगांच्या]] छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांच्ये वर्णन करताना उपयोगी पडले.
 
==आईनंतरचे गुरू==
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.
 
अरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले.
 
हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले.
 
मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले.
 
==कॉलेजात अपयशी==
पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
 
या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले.
 
==वानिकी महाविद्यालयातील अनुभव==
 
 
==मराठी भाषेला शब्दांची देणगी==
Line ४७ ⟶ ६४:
रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो पूर्णही केला.
 
 
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला पहिला गुरू. त्याने (काम चालू)
 
 
 
==मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके==